ज्ञान संपादनासाठी गुरू-शिष्याचे नाते अग्रेसर…
5 सप्टेंबर हा दिवस भारताचे दुसरे राष्ट्रपती डाॅ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या वाढदिवसानिमित्त म्हणजेच जयंती निमित्त संपूर्ण भारतात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 ला झाला.त्यांचा शिक्षण क्षेत्रातील 40 वर्षांचा दांडगा अनुभव पहाता शिक्षक व विद्यार्थी यांच्यात सहयोगाची भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने 5 सप्टेंबर 1962 ला भारतात सर्वप्रथम शिक्षक दिवस साजरा करण्यात आला.तेव्हापासुन दरवर्षी 5 सप्टेंबरला शिक्षक दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो. भारतातील शिक्षकांसाठी 5 सप्टेंबर सन्मानजनक दिन आहे.शिक्षकांच्या प्रती सहयोग व आत्मविश्वास वाढावा आणि भविष्यातील पिढीची आवश्यकता पुर्ण व्हावी याकरिता शिक्षकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने या विशिष्ट दिवसाला अत्यंत महत्व आहे.
शिक्षक दिनाच्या निमित्ताने विद्यार्थी आपल्या गुरूजनांबद्दल आदराची आणि कृतज्ञतेची भावना व्यक्त करतात. शिक्षकांना योग्य मार्गदर्शन मिळावे व शिक्षणामध्ये नवीनीकरण व आधुनिकीकरण करण्याच्या उद्देशाने जागतिक पातळीवर सुध्दा शिक्षक दिवस साजरा करण्यात येतो. 5 आक्टोंबर 1966 रोजी पॅरिसमध्ये अंतर सरकारी सम्मेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यात “टीचिंग इन फ्रीडम” संधीवर हस्ताक्षर करण्यात आले.यानंतर 1994 ला युनेस्कोमध्ये एक सम्मेलन आयोजित करण्यात आले होते व यात 5 आक्टोंबर जागतिक शिक्षक दिवस साजरा करण्याची घोषणा करण्यात आली आणि तेव्हापासून 5 आक्टोंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय शिक्षक दिवस म्हणुन साजरा करण्यात येतो.भारतासह जागतिक स्तरावर ही बाब सर्वांनाच समजायला पाहिजे की गुरू-शिष्याचे काय नाते असते.शिक्षक हा असा चेहरा आहे की तो लाखो ते करोडो विद्यार्थी घडवीतात म्हणजेच जग व देश घडवितो.शिक्षणा विषयी अचूक माहीती देने व प्रत्येक गोष्टीचे महत्व समजावून देणे संपूर्ण शिक्षकांचे प्रथम कर्तव्य असते.यामुळेच आपण घडतो नंतर देश घडते व याचा संपूर्ण प्रभाव जगावर पडतो.
शिक्षक दिनाचा महत्त्वपूर्ण उद्देश म्हणजे शिक्षकांना सन्मान मिळणे व विद्यार्थ्यांना देश घडवीण्यासाठी प्रोत्साहीत करने.आपण जगात आधुनिकीकरण,यांत्रीकरण, औद्योगिकीकरण आता चांद्रयान -3 व आदित्य एल-1 यांची वाटचाल जी पहात आहोत ती शिक्षकांपासुनच निर्माण झालेली उर्जाच म्हणावी लागेल.आपण पहाले की करोणा काळात ऑनलाइन शिक्षण प्रणाली सुरू होती.परंतु विद्यार्थीवर्ग ऑनलाईन शिक्षण प्रणालीला जवळ करायला तयार नव्हते.त्यामुळे शिक्षक व विद्यार्थी यांचे नाते ऑनलाईन राहुच शकत नाही.कारण करोना काळातील दोन वर्षांच्या काळात भारतासह संपूर्ण जगातील विद्यार्थी शिक्षकांपासुन व शाळा-कॉलेजपासुन दुरावले त्यामुळे संपूर्ण शिक्षणाचा खोळंबा झाला होता व आज विद्यार्थांना त्यांचे प्रायश्चित्त भोगावे लागत आहे आणि ऑफलाईन(प्रत्यक्ष) शिक्षण जड होतांना दिसत आहे.ऑफलाईन शिक्षणामुळे जेवढी ज्ञाणामध्ये भर पडते,तेवढी ऑनलाईन(अप्रत्यक्ष)शिक्षण प्रणालीत पडत नाही हे आपल्याला कोरोनाने दाखवून दिले.यामुळे प्रत्यक्षात शिक्षणाने जवळीक वाढुन ज्ञाणात मोठी भर पडते.प्रत्येक देश आप-आपल्या पध्दतीने शिक्षक दिवस साजरा करीत असतो.
भारतात माजी राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्म दिवशी म्हणजे 5 सप्टेंबरला शिक्षक दिवस साजरा करण्यात येतो,चीन 27 ऑगस्ट,रूस 5 आक्टोंबर अशाप्रकारे जगातील अनेक देश आप-आपल्या पध्दतीने शिक्षक दिवस साजरा करतात.कारण यामुळे शिक्षक व विद्यार्थी यांचे अतूट संबंध निर्माण होवून गुरू-शिष्याचे नाते निर्माण होतात.यामुळे शिक्षणाचे आगळावेगळे महत्व दिसून येते.परंतु 5 सप्टेंबरला शिक्षक दिनाचे वेगळेच महत्त्व आहे.कारण या दिवशी गुरू-शिष्य आप आपल्या कामांची पावती देत असतो.त्याच प्रमाणे आंतरराष्ट्रीय पातळीवर सुध्दा तेच दिसून येते.5 आक्टोंबर आंतरराष्ट्रीय शिक्षक दिनाचे वेगळेच महत्व आहे कारण संपूर्ण जग एकाच दिवशी शिक्षकांच्या गुणवत्तेची पावती जगाला देत असते व उत्सहाचे वातावरण निर्माण करतो.यामुळे जगातील शिक्षकांचा मानसन्मान वाढतो व गुरू-शिष्याचे घनिष्ठ संबंध निर्माण होते.भारतात गुरू-शिष्याचे नाते आजचेच नसुन पुरातन काळातील आहे.ऋषी-मुनि,देव-दानव,राजे-महाराजे, थोर पुरुष, क्रांतिकारक, खेळाडू, शास्त्रज्ञ, वैज्ञानिक, डॉक्टर याची संपुर्ण वाटचाल शिक्षकांपासुनच निर्माण झाली आहे. आपण खेळांचा जरी विचार केला तर गुरू शिवाय खेळाडू सुध्दा तयार होत नाही.म्हणजेच कोणतेही शिक्षण असो या करीता शिक्षक अती आवश्यक असतोच म्हणून म्हणतात “गुरू बिना ज्ञान अधुरा” आई-वडीलांमध्ये सूध्दा आपल्याला मुलांच्या दृष्टीकोनातून गुरू-शिष्याचे अतुट नाते दिसून येते.म्हणुन या पृथ्वीतलावर गुरू-शिष्याचे सर्वात मोठे नाते म्हणजे आई-वडिल होय.तेव्हाच मुलं-मुली परीपक्व होतात. त्याकाळी शिक्षकांना गुरू म्हणायचे व विद्यार्थ्यांना शिष्य.आताही तेच आहे फक्त शब्द बदलून शिक्षक-विद्यार्थी असे नामकरण झाले आहे.म्हणजे पुर्वीही शिक्षकांविना( गुरू) शिक्षण अधुरे रहायचे आणि आजही तेच आहे.त्यामुळे शिक्षक हा घटक जगासाठी व देशासाठी अत्यंत महत्त्वाचा आधारस्तंभ आहे.कारण यातुनच विद्यांर्थांचा उगम होतो व देश घडवीण्याचा मार्ग मोकळा होतो.
शिक्षण हे विकत मिळत नसते तर ते अवगत करावे लागते.शिक्षण ही अशी संजीवनी आहे की त्याला कोणीही चोरू शकत नाही किंवा हीरावु शकत नाही.त्यामुळे शिक्षण शिकण्यासाठी कोणत्याही प्रकारची वयोमर्यादा किंवा अटी नसते.परंतु शिक्षणाचा उज्ज्वल मार्ग निर्माण करण्यासाठी चांगल्या शिक्षकांची आवश्यकता जरूर असते.शिक्षक दिनाच्या निमित्ताने भारतातील संपूर्ण शिक्षकांनी पृथ्वीवरील जीवसृष्टी वाचविण्यासाठी 5 सप्टेंबरला प्रत्येक शिक्षकांनी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्याचा संकल्प करावा व यात संपूर्ण विद्यार्थांना(शिष्यांना) सहभागी करून संपूर्ण भारतात हिरवागार गालिचा निर्माण होईल यापध्दतीने संपूर्ण शिक्षकांनी पाऊले उचलावीत.जेनेकरून संपूर्ण जगात शिक्षकांचा एक आगळा वेगळा संदेश भारतातुन जाईल.यामुळे निसर्ग प्रफुल्लित रहाण्यास मोठी मदत होईल.कारण गुरू-शिष्याच्या पुढील वाटचाली करीता मन प्रसन्न असने गरजेचे आहे.कारण पुर्वी शिक्षण हे वृक्षांच्याच सानिध्यात दिले जात असे त्यामुळेच आज प्रत्येकांच्या आयुष्यासाठी गुरू -शिष्याप्रमाणेच वृक्षांशीही नाते घनिष्ठ करणे गरजेचे आहे.कारण ज्या प्रमाणे शिक्षकांविना ज्ञाण नाही त्याच प्रमाणे वृक्ष विना सृष्टी नाही म्हणजेच संपूर्ण जीवन अधुरेच.त्यामुळे प्रत्येक सणाला, महत्त्वपूर्ण दिवसाला वृक्षारोपण व्हायलाच पाहिजे. 5 सप्टेंबरला शिक्षक दिनाचे, औचित्य साधून मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड व्हायला हवी. शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
रमेश कृष्णराव लांजेवार
माजी विद्यापीठ प्रतिनिधी नागपूर
मो: 9921690779