जैन धर्मियांनी आपला धर्म दुसऱ्यांवर लादू नये

जैन धर्मियांनी आपला धर्म दुसऱ्यांवर लादू नये

पर्युषण पर्वात मांसाहार जबरदस्तीने बंद करायला लावले चुकीचे

जैन धर्मियांनी आपला धर्म दुसऱ्यांवर लादू नये

मुंबई: जैन धर्मीय राजकारणी लोकांनी विनाकारण राजकारण करू नये,राज्यात धार्मिक वाद लावू नये. प्रत्येकाने आपला धर्म पाळावा पण तो घरात, कोणी काय खावे कोणते दुकान उघडे ठेवावे याबद्दल दबाव टाकू नये. तसेच शासनानेसुद्धा अशा धर्मीक संघटनांच्या मागणीकडे दुर्लक्ष करावे. जैन धर्मियांनी अशीच जबरदस्ती चालू ठेवल्यास प्रशासनाला लेखी पत्र देऊन आंदोलनाचा इशारा मराठी एकीकरण समितीकडून देण्यात आला आहे. मांसाहार बंदला मराठी एकीकरण समितीचा विरोध आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यात कोणी काय खावे, कोणी कधी काय विकावे यावर ४% लोकसंख्या असणाऱ्याच्या सांगण्याहून निर्णय शासनाने घेऊ नये. तुमच्या सणांचा परिणाम राज्यातील स्थानिक आगरी, कोळी यांच्या व्यवसायावर होतो. या काळामध्ये मच्छी आणि मांसाहाराची दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय पुर्णपणे बेकायदेशीर आहे. त्यामुळे या जैन सणांच्यावेळी जाहीर करण्यात आलेला हा निर्णय त्वरित रद्द करावा, अन्यथा आंदोलनाचा इशारा मराठी एकीकरण समितीने दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here