कधी थांबतील महिला वरील अत्याचार??
कधी थांबतील महिला वरील अत्याचार??

कधी थांबतील महिला वरील अत्याचार??

लेखीका नीलम खरात
रा. भायखळा, मुंबई

कधी थांबतील महिला वरील अत्याचार??
कधी थांबतील महिला वरील अत्याचार??

आज भारतातील कुठलही शहर घ्या किंवा कुठलही गाव घ्या, आज या विशाल भारतात तरुणी, महिला, लहान चिमुकल्या कुठेही सुरक्षित नाहीत. मग मनात राहून राहून एकच प्रश्न निर्माण होतो. याला जबाबदार कोण? सरकार, पोलिस की खुद्द तरुणी, महिला या त्या छोट्या छोट्या चमुकल्या? काही वर्षा अगोदर दिल्लीत निर्भया बलात्कार अत्याचाराचे प्रकरण घडले. त्यानंतर संपुर्ण देशात, गाव, खेड्यात अनेक आंदोलने झाली. पण गुन्हेगाराचे काय झाल आपण सर्व जानता. काही वर्षा अगोदर खैयलाजी प्रकरण. प्रियंका भोतमांगे बरोबर अत्याचार झाला, मानवतेची सर्व परीसीमा दिवसाढवळ्या लाथे खाली तुडवण्यात आली. ते किती भयानक होते ते सगळे? विचार पण करु शकत नाही. आज रोज कुठे ना कुठे एकापाठोपाठ कित्येक मुलींवर, महीलेवर, चिमुकल्या मुलीवर अत्याचार होतो आहे. स्त्री ही स्वभावत:च सोशिक, घाबरट, भिडस्त असल्याने आपण तिच्यावर बलात्कार केला, तर ती आवाज उठवणार नाही, अशी खात्री असे कृत्य करणाऱ्यांना नराधमाना वाटते. ते अगदी चुकीचे आहे.

एखादी पीडित तरुणी समाजाला घाबरूनच तिच्या वर झालेल्या अत्याचारावर गप्प बसते. ती वेळीच आवाज उठवत नसल्याने नराधमांचे चांगलेच फावते. दिल्लीमध्ये निर्भया वर झालेला सामूहिक बलात्कार आणि त्यातून झालेला तिचा दुर्दवी अंत या घटनेने देशातील वातावरण ढवळून निघाले होते. तिच्या प्रति आस्था वाटून मोर्चा काढला गेला, सरकारच्या निष्क्रियतेवर टीका झाली. या घटनेतील दोषींना फाशी देण्यात यावी, अशी मागणी केली गेली. खैलाजी येथील प्रियंका भोतमांगे हलाहल करुन विषारी चटके भोगले. तळफळुन अंत झाला. महाराष्ट्र या अत्याचारावर रान माजले होते. एवढ सगळे होवूनही महिलांवर, मुलीवर होणारे अत्याचार व बलात्कार थांबले नाहीत. उलट अजूनच वाढत असल्याचे अनेक बातम्या वरुन समोर येत असते. असे गुन्हे का घडताहेत. तरुणपणी किंवा प्रौढ वयात विषयवासना निर्माण होणे हे नैसर्गिक आहे. पण त्याला आवर घालणे, स्वतःच्या मनावर ताबा ठेवणे हा सुसंस्कृतपणा होय. वासना, आकर्षण आणि झिडकारले म्हणून बदल्याची भावना यामुळेही अशा घटना वारंवार घडत असतात. सगळ्यात मोठे कारण म्हणजे दारूची नशा आणि त्यात मनावरील नियंत्रण सुटते तसेच इंटरनेटवर मन विकृत करणाऱ्या क्लिप्स व टीव्हीवरील उत्तेजित करणारी दृश्य किंवा सीडीज् पाहणे यामुळेच भावनांचा उद्रेक होतो आणि त्यातून निष्पाप तरुणीचे जीवन संपुष्टात येते. तरुण मुले मोबाइलवरून अश्लील व्हिडिओ क्लिपस् एकमेकांना पाठवतात. कारणे काहीही असली, तरी बलात्काराचे गुन्हे घडतातच. मग ही विकृती का फोफावते याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

आज कित्येक तरुणी शिक्षणासाठी, नोकरीसाठी वा करिअरसाठी एकट्या अनोळखी शहरात घरच्यांपासून दूर राहतात. निर्जन रस्त्याने एकटीने जाणे योग्य नसते हे कळत असूनही पर्याय उपलब्ध नसल्याचे वाट काढून जातात. मग या अशा एकट्या मुलींना पाहून नराधमांचे डोळे विस्फारतात आणि अमानुष कृत्य घडतात. काही गुन्हेगार पकडले जातातही. पण नंतर पुरेशा पुराव्यांअभावी वा तपासातील त्रुटींमुळे लगेच सुटून पुन्हा अशा विकृत वासना घडतातच. प्रश्न असा पडतो की, बलात्कार करण्याची प्रवृत्ती का फोफावत आहे? याचे पहिले कारण म्हणजे देशात फोफावलेला भ्रष्टाचार. बलात्कार केल्यानंतर आपण पकडलो गेलो, तरी पोलिसांना मॅनेज करू शकू ही मानसिकता अशा गुन्हेगारांची झालेली आहे. त्यांना कायद्याची भीती राहिलेली नाही. पोलिसांचा वचक राहिलेला नाही. मोठमोठे गुन्हेगार, राजकीय पुढारी हे बलात्काराच्या खटल्यातून निर्दोष सुटले आहेत. गुन्हा करणाऱ्याची दहशत, आपल्याला न्याय मिळणार नाही, कोणी मदत करणार नाही या भीतीपोटी अनेक प्रकरणे उघडकीस येत नाहीत. या सर्व अन्यायाचा बिमोड कसा करायचा? त्यांना आवर कसा घालायचा? हा सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न आहे. बलात्काराचे खटले चालविण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन केली पाहिजेत. शिवाय कायद्यात सुधारणा केली पाहिजे. कायदे कडक व कठोर हवेत. हा गुन्हा ‘रेअरेस्ट ऑफ रेअर’, असे समजून गुन्हेगारास फाशीची शिक्षा दिली गेली पाहिजे. पोलिसांची रस्त्यावर जास्तीत जास्त गस्त हवी. निर्मनुष्य रस्त्यावर पोलिस यंत्रणा सज्ज हवी, जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावेत. व्हिडिओ क्लिपस व अश्लील दृश्यांवर बंदी घालण्यात यावी. थोडक्यात म्हणजे जोपर्यंत समाजाची मानसिकता बदलत नाही तोपर्यंत स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांची समस्या कायम राहील. स्त्रियांनी आपल्या संरक्षणाची काळजी ही स्वतःच घ्यावी. कोणी मदतीला येईल आणि आपले रक्षण करेल ही भ्रामक कल्पना न करता अन्यायाचा प्रतिकार करायला शिकले पाहिजे. समाजातील एकूण चित्र पाहिले, तर आजची स्त्री अद्यापही सुरक्षित नाही एवढे मात्र खरे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here