बेला शेतकऱ्याची गळफास लावून आत्महत्या.
बेला:- नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील बेला येथील शेतकऱ्याने सततची नापिकी, कर्जबाजारीपण व कर्ज वसुलीचा तगादा याला कंटाळून उत्पन्नाचे कोणतेही पर्याय खुले दिसत नसल्याने नैराश्यातून गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली गुरुवारी दुपारी 12.30 वाजताच्या सुमारास घडली आहे. मारुती शामराव वरघने 44 असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
मारुती शामराव वरघने 44, रा. बेला असे मृताचे नाव आहे. त्यांच्याकडे चार एकर शेती असून, यावर्षी त्यांनी कपाशीची लागवड केली हाेती. त्यांनी तीन वर्षांपूर्वी महिंद्रा फायनान्सकडून 1 लाख 30 रुपयांचे कर्ज घेतले हाेते. पाच दिवसांपूर्वीच त्यांनी कर्जाचा हप्ता भरला हाेता. त्यांनी सावकाराकडून तीन लाख रुपयांचे कर्ज घेतले हाेते, असेही त्याने सांगितले. कर्ज वसुलीचा तगादा वाढला हाेता. त्यातून अपमानित केले जायचे असा आराेप मृताचा मुलगा मुकेश वरघने 23 याने केला आहे. याच चिंतेत त्यांनी शेतात गळफास लावून जीवनयात्रा संपविली. याप्रकरणी बेला पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद करून तपास सुरू केला आहे.