विद्वेषक वक्तव्ये राजकारण्यांनी बंद करावी…

रमेश कृष्णराव लांजेवार 

मो.नं.9921690779

विद्वेषक वक्तव्यामुळे सर्वसामान्यांमध्ये कटुता निर्माण होते व धर्माच्या राजकारणाला नवीन वळण येते.याची झळ समाजातील सर्वच धर्मांतील लोकांना सोसावी लागते. उदाहरण द्यायचे झाले तर एक व्यक्ती धर्माच्या नावावर प्रसार माध्यमातून काहीतरी उलटसुलट बोलतो आणि याचा विपरीत परिणाम संपूर्ण समाजात होतांना आपण पहातो.त्यामुळे राजकारण्यांनीच धर्माला  राजकारणाशी जोडने बंद करावे. यामुळे देशात संवार्धपुर्ण वातावरण दिसून येईल.

भारत हा कृषिप्रधान  देश आहे. त्यामुळे 65  टक्के लोकांची उपजीविका शेतीवर निर्भर आहे आणि 35 टक्के लोक इतर क्षेत्रात आपल्याला पहायला मिळतात.सर्वच लोक आपापल्या कामात व्यस्त असतात.परंतु 100 टक्के लोकांमध्ये जात व धर्मच्या नावावर विष घोळण्याचे काम  राजकारणी नेहमीच करीत असतात ही बाब जगजाहीर आहे याला कोठेतरी थांबविले पाहिजे.आज राजकारण्यांनी देशात धर्माचे व जातीचे राजकारण केले नसते तर आपल्याला वेगळे चित्र पहायला मिळाले असते.

स्वातंत्र्यापुर्वी सर्वच जाती-धर्माच्या लोकांनी एकोप्याने संघटीत होऊन इंग्रजांशी लढा द्यायचे आणि दिला सुध्दा.त्यामुळेच 15 ऑगस्ट 1947 हा दिवस उजाडला व भारत स्वतंत्र झाला.परंतु भारत स्वतंत्र झाल्यानंतर देशात राजकारणात वेगवेगळे परीवर्तन दिसून आले आणि यातून जात व धर्माच्या राजकारणाला सुरुवात झाली.आज जात-धर्माच्या नावावर राजकीय पक्ष आपल्या पक्षांचे उमेदवार ठरवित असतात.कोणत्या ऐरियामध्ये कोणती जात किंवा कोणत्या धर्माचे लोक जास्त आहे हे पहाले जाते त्यानंतर उमेदवार ठरविला जातो.यातुनच धर्म -जातीयवादाला नवीन वाचा फुटते व द्वेषभावणा निर्माण होते आणि समाजातील धर्मा-धर्मात कटुता निर्माण होते.त्यामुळे धर्माचे राजकारण थांबले पाहिजे या सर्वोच्च न्यायालयाच्या मताशी मी सहमत आहे.

कारण राजकारण आणि धर्माची राजकारण्यांकडून सरमिसळ होते, तेव्हा समस्या मोठी होते.ज्या क्षणी राजकारण आणि धर्म वेगळे ठेवले जातील, तेव्हा द्वेषमूलक भाषणांची चिंताही संपेल हे काम राजकारण्यांचे आहे.परंतु राजकारणी कदापि असे करायला तयार नसतात.कारण त्यांना आपले राजकारण जीवंत ठेवायचे असते यासाठी राजकीय पुढारी कोणत्याही स्तरावर जायला मागेपुढे पाहत नाही व विद्वेषी वक्तव्याचा वापर करतात.त्यामुळे देशात जात-धर्म हा जो संघर्ष निर्माण केलेला आहे त्यात शंभर टक्के वाटा राजकीय पुढाऱ्यांचा आहे.इंग्रजांनी आपल्यामध्ये आपसा-आपसात कटुता निर्माण करून दिडशे वर्ष राज्य केले.त्याचप्रमाणे राजकीय पुढारी आपली पोळी शेकण्यासाठी धर्माचे राजकारण करतांना दिसतात. त्यामुळे राजकारण्यांनी व्देषपुर्ण भाषणांवर आवर घातला पाहिजे.

राजकारण आणि धर्म जेव्हा भिन्न होतील आणि राजकारणी धर्माचा वापर राजकारणासाठी करणे थांबवतील, त्याक्षणी व्देषमूलक भाषणेही थांबतील असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने बुधवार दिनांक 29 मार्च 2023 ला नोंदवले.राजकारणी लोक निवडनूकीचा फॉर्म भरतात तेव्हा शपथ पाळतात जात, धर्म, द्वेष इत्यादी अनेक शब्दांचा उपयोग करून याचा कुठेही अपमान होणार नाही अशा पध्दतीची ग्वाही देतात व शपथ घेतात.परंतु राजकारणी स्वतःच्या स्वार्थासाठी जात-धर्माला राजकीय पुढारी बळी देतांना दिसतात व समाजामध्ये कटुता निर्माण करतात.

सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की जवाहरलाल नेहरू, अटलबिहारी वाजपेयी यांची भाषणे ऐकण्यासाठी अगदी दुर्गम भागातील लोक देखील मोठ्या संख्येने येत असत.मात्र आता राजकीय नेत्यांनी धर्म व राजकारण यांची सरमिसळ केली असून त्याचा लोकशाहीला मोठा धोका आहे.किती लोकांवर कारवाई करायची यालाही एक मर्यादा असते.काही लोक दर दिवसाला इतरांबद्दल व्देष पसरविणारी वक्तव्ये टीव्हीतील कार्यक्रमात तसेच सार्वजनिक समारंभात करीत असतात.अशा प्रकारे खुलासा सर्वोच्च न्यायालयाने केला आहे.त्यामुळे भारताची एकता व अखंडता सुनिश्चित करण्यासाठी राजकारण्यांनी धर्माला राजकारणापासून दूर ठेवले पाहिजे.कारण राजकारणात धर्म आला की जात येते,जात आली की द्वेष वाढतो,द्वेष आला की कटुता येते, कटुता आली की वाद-विवादाचा निर्माण होतो व संघर्षाची चिंगारी निर्माण होते.त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा मान राजकारण्यांनी ठेवून यानंतर कोणत्याही राजकारणात कोणीही धर्माचा वापर करणार नाही याची जबाबदारी सर्वांनीच स्वीकारली पाहिजे.

विद्वेषी वक्तव्ये रोखण्याची जबाबदारी केंद्र सरकार,राज्य सरकारे व संपूर्ण राजकीय पक्षांची आहे.याकरीता सरकारने कायदा बनवायला हवा की विद्वेषक वक्तव्ये देणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांवर कठोर कारवाई व्हायलाच हवी व त्या व्यक्तीला लोकप्रतिनिधी, जनप्रतिनिधी व संपूर्ण राजकीय पक्षांतुन निलंबित करायला हवे.असे जर झाले तर कोणताही राजकीय पुढारी राजकारणासाठी विद्वेषक वक्तव्ये मुळातच करणार नाही व कायद्यांचा सन्मान होईल.त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे काटेकोरपणे पालन संपूर्ण राजकारण्यांनी करायलाच हवे यामुळे संपूर्ण राज्यात व देशात चांगला संदेश जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here