रायगड जिल्ह्यात गावागावात स्वच्छता अभियान संपन्न

रायगड जिल्ह्यात गावागावात स्वच्छता अभियान संपन्न

रायगड जिल्ह्यात गावागावात स्वच्छता अभियान संपन्न

रायगड जिल्ह्यात गावागावात स्वच्छता अभियान संपन्न

रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग: रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून १ व‌ २ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यात श्रमदान मोहीम उत्साहात राबविण्यात आली. श्रमदान मोहिमेअंतर्गत गावागावात स्वच्छता अभियान हाती घेण्यात आले होते. स्वच्छता अभियानात लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत अधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, नागरिक सहभागी झाले होते. लाखो हातांनी मिळून जिल्हा स्वच्छ केला.

शासनाने १ व २ ऑक्टोंबर रोजी देशभर स्वच्छता ही सेवा अभियान राबविण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानुसार रायगड जिल्ह्यात गावागावात श्रमदान करण्याचे नियोजन करण्यात आले. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून सर्वांनी श्रमदान मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याचे दृश्य परिणाम पहावयास मिळाले. प्रत्येक गावागावात उत्स्फूर्तपणे स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

स्वच्छता अभियान अंतर्गत सार्वजनिक परिसर, शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, प्रार्थनास्थळे, बाजार, बस स्थानक, समुद्रकिनारे, नदी किनारी, तलाव परिसर यासह इतर ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. जमा करण्यात आलेला कचरा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून डंपिंग ग्राउंड ठिकाणी नेण्यात आला. तसेच सर्वत्र नागरिकांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली.
………………
वरसोली समुद्रकिनारी बुधवारी (दि.२) सकाळी ८.३० दरम्यान जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड व पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. रायगड जिल्हा परिषद, रायगड पोलीस, नेहरू युवा केंद्र, अलिबाग पंचायत समिती, वरसोली ग्रामपंचायत, प्रिझम सामाजिक विकास संस्था, माणुसकी प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या स्वच्छता मोहिमेत जिल्हा परिषद पाणी व स्वच्छता विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी शुभांगी नाखले, नेहरू युवा केंद्र जिल्हा समन्वयक निशांत रौतेला यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
………………….
जिल्ह्यात आज सर्वत्र श्रमदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. श्रमदान ही एक चळवळ म्हणून सर्वांनी कायम ठेवली पाहिजे. सर्वांनी मिळून पृथ्वी, जल, वायू स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत. प्रत्येकाने आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासोबत सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे.
: डॉ. भरत बास्टेवाड
मुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड जिल्हा परिषद.
…………………..