वर्धा जिल्हात जेवनातुन डझन भर लोकांना विषबाधा.
आशीष अंबादे प्रतीनिधी
वर्धा:- जिल्हातील भिडी खर्ड़ा येथे जेवनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमात 12 लोकांना विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. या सर्व 12 लोकांना भिडी येथील ग्रामीण आयोग्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.
खर्ड़ा येथील रहिवासी असलेले काकडे यांच्या घरी पौष महीन्यानिमित्त जेवणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी गावतील नातेवाईकांना आणी इतर मित्र परीवाराना जेवणाकरिता आमंत्रीत करण्यात आले होते. 30 जानेवारी ला जेवण करुन घरी गेलेल्या लोकांना अचानक पोटात दुखने, थंडी लागने, ताप येऊन अतीसार सुरु झाला. या लक्षणानी खर्ड़ा गावातील लोकांना ग्रासले असताना सर्वाना भीतीदायक वातावरण दिसून येत होते. यातील काही लोकांना तातडीने सावंगी येथील उपचार घेतले. तर 1 फेब्रुवारी ला सकाळी सर्व लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर वैधकीय अधिक्षक डॉ. राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. मून आणी परिचारिका उपचार करित आहे. नेमकी विषबाधा कसातुन झाली यांचे अजुन पर्यंत निदान लागले नाही.