अपघाताच्या ठिकाणी वैद्यकीय सेवा पुरवली गेली असून, जखमींबद्दल माहिती रेल्वे प्रशासनाकडून अद्याप जाहीर केलेली नाही
सिद्धांत
३ एप्रिल, मुंबई: मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस वरून निघालेल्या जयनगर एक्सप्रेसचे काही डबे नाशिकमधील देवळाली-लहवीत या परिसरामध्ये रुळावरून खाली घसरले. या दुर्घटनेत काही प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून प्रशासनाचे अधिकारी आणि बचावदल घटनास्थळी दाखल झाले असून बचाव कार्याला सुरुवात झाली आहे.
आज दुपारी ३ वाजून १० मिनिटांनी हि दुर्घटना घडून आली. जैनागर एक्सप्रेसचे चार डबे रुळावरून घसरल्याने हा अपघात घडून आला. अपघातामागचे नक्की कारण कळू शकले नसले तरी मार्गावरील रूळ तुटल्याने अपघात झाल्याचे बोलले जात आहे. दरम्यान अपघाताच्या ठिकाणी वैद्यकीय सेवा पुरवली गेली असून, जखमींबद्दल माहिती रेल्वे प्रशासनाकडून अद्याप जाहीर केलेली नाही.
Due to derailment on Bhusaval Division following is list of the trains cancelled/diverted 👇 pic.twitter.com/az8arIGm73
— Central Railway (@Central_Railway) April 3, 2022
अपघातानंतर रेल्वेकडून नागरिकांसाठी हेल्पलाईन जाहीर करण्यात आली आहे. सीएसएमटी स्टेशनचे टीसी कार्यालय – ५५९९३, आणि एमटीएनल ०२२२२६९४०४० ह्या क्रमांकावर संपर्क करायचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान मार्गावरील काही ट्रेन्स रद्द करण्यात आल्या असून. काही ट्रेन्सचे मार्ग बदलण्यात आले आहेत. याबद्दल मध्य रेल्वेने ट्विट करत माहिती प्रसारित केली आहे.
हे आपण वाचलंत का?
- महाराष्ट्रातील उल्का आणि अंतराळातील कचरा
- भारत माझा देश आहे , इंडिया तुमचा देश आहे
- रेल्वेने ज्वेलरी घेऊन जात असलेल्या एका ज्वेलर्स कर्मचाऱ्याच्या बॅगेतून १ किलो १७० ग्रम सोन्याचे दागिने चोरीला