गोंडपीपरी तालुक्यातील विहीरगाव येथील यूवा शेतकऱ्याची विहीरीत उडी घेऊन आत्महत्या.
राजू ( राजेंद्र ) झाडे
गोंडपीपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177
गोंडपीपरी:- तालुक्यातील विहीरगाव येथील शेतकरी आकाश चौधरी हा वडीलोपार्जीत असलेली शेती करत होता मागील वर्ष भरापासून कोरोना या महामारी मूळे शेती करण्यासाठी त्याच्याकडे आर्थिक अडचण निर्माण झाली होती आर्थिक अडचणीतून मार्ग काढण्यासाठी त्यांनी अनेकांकडे हात पसरले अशातच आज वैतागून त्यांनी विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.
कोरोना महामारीच्या काळात ग्रामीण भागात आकाश चौधरी हा तालुक्यातील ग्रामीण क्षेत्रात पत्रकार म्हणून कार्यरत होता शिवाय त्यांनी या रोगावीषयी बातमीच्या माध्यमातून प्रसार व प्रचार करण्याचा त्यांनी विडा उचलला या दृष्टीने त्याचे काम सुरू होते. याचबरोबर आपल्या पारंपरिक व्यवसाय कडे देखील त्यांने लक्ष केंद्रित केले होते.
त्याच दरम्यान कोरोना महामारीच्या काळात उपजीविकेचे साधन असलेल्या शेतीसाठी त्यांना आर्थिक उपाययोजनेची गरज होती .. त्यासाठी त्यांने अनेकांकडे मदतीचा हात पसरला याच दरम्यान त्यांने अनेकांकडून आर्थिक मदत सुध्धा घेतली होती. परंतु अतीवृष्टीमूळे त्याचे कंबरडेच मोडले आणी तो हताश झाला अशा वैतागलेल्या परीस्थीतीतून मार्ग काढण्यासाठी आकाश ने आत्महत्येचा मार्ग निवडला असल्याची चर्चा सुरू आहे.
आकाश चौधरी याच्याकडे शेती शीवाय दूसरा कोणतेच उत्पन्नाचे साधन नव्हते त्याच्या पच्छात पत्नी दोन मुले आणि आई वडील.असा परीवार आहे. आकाश हा घरं चालवणारा कमवीता एकच व्यक्ती होता त्याच्यावर संपूर्ण कुटुंब अवलंबून होते. अशा काळात त्याच अचानक सोडून जाण्यामुळे आकाश चौधरीच्या कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे.