वर्धा जिल्हाचे खासदाराच्या मुलाने लग्नाचे आमिष दाखवुन उच्च शिक्षीत मुलीवर केला सलग तीन वर्षे बलात्कार.
वर्धा जिल्हाचे खासदाराच्या मुलाने लग्नाचे आमिष दाखवुन उच्च शिक्षीत मुलीवर केला सलग तीन वर्षे बलात्कार.

वर्धा जिल्हाचे बीजेपी खासदाराच्या मुलाने लग्नाचे आमिष दाखवुन उच्च शिक्षीत मुलीवर केला सलग तीन वर्षे बलात्कार.

== मुख्य मुद्दे ==
पिढीत मुलीने केली पोलीस महानिरीक्षक नागपूर यांना तक्रार.
खासदार पुत्राच्या बलात्कार प्रकरणाने वर्धा जिल्हात एकच खळबळ.
पिढीत गर्भवती झाली तर तिला अघोरी पद्धतीने केला गर्भपात

वर्धा जिल्हाचे खासदाराच्या मुलाने लग्नाचे आमिष दाखवुन उच्च शिक्षीत मुलीवर केला सलग तीन वर्षे बलात्कार.
वर्धा जिल्हाचे खासदाराच्या मुलाने लग्नाचे आमिष दाखवुन उच्च शिक्षीत मुलीवर केला सलग तीन वर्षे बलात्कार.

मुकेश चौधरी
उप संपादक मिडिया वार्ता न्युज
7507130263
वर्धा/देवळी:- वर्धा जिल्हातील देवळी येथून एक संतापजनक बातमी समोर येत आहे. वर्धा जिल्हाचे खासदार रामदास तडस यांच्या यांच्या नाव पंकज तडस या मुलाने लग्नाचे आमिष देऊन एका उच्च शिक्षित मुली बरोबर सतत तीन वर्ष शारिरीक संबंध प्रस्थापीत करुन अनेक दा बलात्कार केल्याच्या घटनेने वर्धा जिल्हात संतापाची लाट प्रसरली आहे.

नराधन आरोपी पंकज तडस हा खासदार यांच्या मुलगा असल्यामुळे या प्रकरणात पोलीस प्रशासनावर मोठा दबाब येत असल्याची महिती सूत्राकडुन मिळाली आहे. परंतु ही मुलगी आपल्याला कुणीतरी न्याय देईल या आशेने दारोदारी फिरत आहे याची खरी खंत आहे.

प्राप्त माहितीनुसार पाच वर्षा अगोदर वर्धा येथील एका उच्च शिक्षित मुलीची खासदार पुत्र पंकज यांची ओळख ऐका कार्यक्रमात झाली. बाप खासदार असल्यामुळे या नराधम आपल्या बापाचा राजकीय फायदा घेत आपले डोळे या मुलीवर टाकायला सुरुवात केली. आणि काही दिवसानी संपर्क वाढवुन बोलणे सुरू केले. नराधम पंकजने त्या उच्च शिक्षित पिढीतेला आपण उच्चशिक्षित असल्याचे सांगितले.

मुलाचा बाप खासदार मुलगा शिकलेला आणी लग्नाचा प्रस्ताव ठेवत आहे. यापेक्षा अजुन काय चांगले अशु शकते म्हणुन पिढीत मुलीने घाईघाईत लग्नाला होकार न देता प्रस्ताव विचाराधीन ठेवला. पण नराधम पंकज सतत पिढीतेचा मागे लागला आणि लग्नाचा तगादा लावला. त्यांमुळे पिढीतेने याबद्दल आपल्या घरी सांगितले. याप्रकारे नराधम आरोपी पंकजचे पिढीतेच्या घरी येणे जाणे सुरू झाले मुलाच्या आई बहिणीला ओळख करून दिली वडिलांनाही प्रकरण माहीत झाले. आता आज नाही उद्या लग्न होणार म्हणुन पिढीत मुलीने पंकज वर विश्वास केला.

नराधम पंकज तडस या खासदार पुत्राने एके दिवस रात्री उशिरा पिढीत मुलीला भेटायला बोलवले. ती भेटायच्या ऊद्देशाने तिथे गेली. त्यावेळी तिच्या बरोबर तिच्या मना विरुद्ध शारिरीक संबंध आरोपीने प्रस्थापीत केले.

मी तुझा बरोबर लग्न करणार आहे. आपण नवरा बायको होणार आहोत ! असा खोटा विश्वास देऊन अखेर पिढीतेच सर्वस्व लुटले. हा प्रकार अनेक वेळा झाला. ती पिढीत मुलगी लग्नाच सप्न बघत हे सर्व सहन करत होती.

नराधमाने अवैधरित्या बनवलेल्या शारिरीक संबंधातून पिढीता गर्भवती झाली आता काय होणार? यानंतर पिढीतेने लग्नाचा तगादा लावला आणी प्रकरण वाढले. लग्नाचे नाव घेतले तर त्याच्या रक्तात करंट येत होता. आणी अखेर त्याचा मूळ स्वभाव समोर आला. आणी तो तिला ज्या फ्लॅटवर बोलावून कुकर्म करायचा त्याच ठिकाणी तिला मारहाण करून जबरीने सतत बलात्कार करायचा मात्र ज्या वेळी ही गर्भवती झाली .याची त्याला माहिती झाली. त्यावेळी त्याने गर्भ पडणे म्हणजे पुरावा मिटविण्या करिता तिची समजुत घालून घरीच हवे नको ते औषध दिले. अघोरी पद्धतीने गर्भपात केल्याने पिढीत मुलीची प्रकुर्ती बिघडली तिला रक्तपात आणी प्रचंड वेदना होत असताना ती सेवाग्राम येथील रुग्णालयात भरती झाली. प्रकरण वाढेल या भीतीने वर्धा येथील एका वैदिक लग्न लावणाऱ्या संस्थेत जाऊन केवळ मुलीने बोंब मारून हे प्रकरण पुढे आणू नये म्हणुन घरीच सही करून एक लग्नाचे सर्टिफिकेट करून आणले. काही दिवस तिला संपूर्ण परिवाराने विस्वासात घेऊन जसे लग्न करून आणली सून असे ठेवले आणी मामला शांत होताच तिला बेधम मारले त्यावेळी घरात पूर्ण परिवार होता मात्र कुणीच सोडले नाही. ही बाब आपल्या अंगलट येईल या भीतीने खासदार साहेब आणी त्यांची पत्नी यांनी काढता पाय घेतला आणी वर्धा गाठली आणि नामा निराळे जरी झाले तरी यात यांचा दोष नाही असे म्हणता येणार नाही. अलगद मुलीला आपल्या माहेरी पाठवून या प्रकरणाला आवागमनी करण्याचा यांचा आजही आटा पिटा सुरूच आहे. वास्तविक हे लग्न कोणत्याही सरकारी दप्तरी नोंद नाही त्यामुळे यांना पोलीस नवरा बायको म्हणू शकत नाही. हे लग्न सरकारी दप्तरी नोंद करावी अशीच पिढीत मुलीची आजही मागणी आहे. हे लग्न कोठेही मान्यता प्राप्त नाही कारण केवळ परस्पर कागद तयार करणे म्हणजे लग्न होत नाही. मुलीचा नकार असतांना तिच्यासोबत जबरीने संभोग करणे हा बलात्कारच आहे आणी या वर योग्य तो गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी पिढीत मुलीची मागणी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here