इथे सर्व पांडव आहेत आणि आपला श्रीकृष्ण हे शरद पवार साहेब आहेत – आ. जितेंद्र आव्हाड
मीडियावार्ता
५ जुलै, मुंबई: अजित पवार राष्ट्रवादी गट सोडून गेल्यानंतर शरद पवारांनी आज मुंबई येथे राज्यभरातील पदाधिकाऱ्यांची, कार्यकर्त्यांची सभा बोलवली होती. या सभेला महाराष्ट्रभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी भाषण करताना पक्षाचे प्रतोद आ. जितेंद्र आव्हाड यांनी भाषण करत राष्ट्रवादीच्या फुटलेल्या गटावर जबरदस्त टीका केली.
लढाई केवळ पावसामुळे लढली जाते असे नाही, तर लढाई ही हुशारीने जिंकली जाते…. देशात संविधान तुडवले जात असल्याचे चित्र दिसते. आमदार हा खरेदी-विक्री संघ आहे, की कांद्याचा भाव आहे अशी टीका पक्षाचे प्रतोद आ. जितेंद्र आव्हाड यांनी केली. निवडणुकीच्या प्रचारासाठी तुम्हाला आदरणीय शरद पवार साहेब लागतात. आता अचानक तुम्ही म्हणता की आम्हाला शरद पवार नको. तुम्ही साहेबांचा चेहरा का वापरता. तुम्ही मतदारांना आकर्षित करू शकाल असे चेहरे वापरावे. तुम्हाला निवडून आणण्यासाठी तोंडातून रक्त गळत असतानाही प्रचारासाठी उभ्या राहिलेल्या बापाला इतकं दुःख देता. ज्याला गुरु बोलायचे त्यालाच दुःख द्यायचे, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही.
https://mediavartanews.com/2023/07/05/sharad-pawar-ajit-pawar-conflicts-latest-update/
तुम्ही पवार साहेबांना जखमी करून टाकलंय. पण हा जखमी शेर आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. जे आमदार पवार साहेबांसोबत आहेत ते वाचतील अन्यथा इतर सर्व घरी जातील, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. शरद पवार माझी खासगी मालमत्ता आहे का अशी विचारणा केली जाते. मात्र ही सरंजामशाहीची पद्धत माझ्यात नाही. मी त्यांच्या पायाची धूळ आहे. पण जेव्हा बापावर येते तेव्हा छातीचा कोट करण्याचा महाराष्ट्राचा इतिहास आहे. इथे सर्व पांडव आहेत आणि आपला श्रीकृष्ण हे शरद पवार साहेब आहेत. इतिहास सांगतो की अधर्माविरोधात धर्माची लढाई होते, तेव्हा धर्माचा पराभव होऊ शकत नाही. नाशिकला साहेब येणार तेव्हा हिंमत असेल तर त्यांना अडवून दाखवा, असे आव्हान आव्हाड यांनी दिले.
https://mediavartanews.com/2023/07/05/ncp-supriya-sule-speech-politics-news-update/