प्रवेश रद्द केल्यास शुल्क परत मिळणार
युजीसीकडून विद्यार्थ्यांना दिलासा
🖋 अश्विन गोडबोले
चंद्रपूर महानगर प्रतिनिधी
📱 8830857351
मुंबई, 5 ऑगस्ट : – विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. युजीसीने महाविद्यालये आणि विद्यापीठांसह सर्व उच्च शैक्षणिक संस्थांना विद्यार्थ्यांने प्रवेश परत घेतल्यास किंवा त्यांचे प्रवेश रद्द केल्यास संपूर्ण शुल्क परत करण्यास सांगितले आहे. मात्र, विद्यार्थ्यांनी ३१ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीत प्रवेश मागे घेतल्यास एका विद्यार्थ्याकडून शुल्क म्हणून एक हजार मुंबईसह रिसरात तीन जांच्या रुपयांपेक्षा अधिक रक्कम वजा करून क्यता घेण्यात आलेले संपूर्ण शुल्क परत केले कोकण रिसरात, जाईल. पालकांच्या आर्थिक अडचणी टाळण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. म्हणजेच ३१ ऑक्टोबरपर्यंत प्रवेश रद्द झाल्यावर संपूर्ण शुल्क परत देण्यात येणार आहे. ऑगस्ट ते सप्टेंबरदरम्यान शैक्षणिक सत्र सुरू करणाऱ्या अनेक खाजगी विद्यापीठांच्या परतावा धोरणानुसार, वर्ग सुरू झाल्यानंतर महिनाभर प्रवेश रद्द झाल्यास विद्यार्थ्यांना कोणताही परतावा मिळणार नाही. सीयूईटी यूजी परीक्षा २० ऑगस्ट २०२२ रोजी संपत आहे आणि सुमारे १५ दिवसांनी निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. जोपर्यंत केंद्रीय विद्यापीठ आणि इतर सहभागी विद्यापीठांमध्ये प्रवेश सुरू होत नाहीत, तोपर्यंत रिफंड विंडो संपणार आहे. युजीसीने १६ जुलै २०२१ रोजी मार्गदर्शक सूचनांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२१-२०२२ मध्ये विद्यार्थ्यांचे प्रवेश, स्थलांतर यामुळे शुल्क परताव्यासाठी धोरण तयार केले होते.
अभियांत्रिकीला जाणारे बहुतांश विद्यार्थी या प्रवेशाच्या आधी अन्य अभ्यासक्रमासाठी कुठे ना कुठे तात्पुरता प्रवेश घेऊन ठेवतात. अन्य अभ्यासक्रमासाठी भरलेले शुल्क परत मिळण्यासाठी संघर्ष करणाऱ्यांना या निर्णयामुळे दिलासा मिळण्याची शक्यता आहे.