भजनी मंडळानी केले भाविकांच्या मनाला समाधान देण्याचे मोलाचे काम: आ. सुधीर मुनगंटीवार
भाजपा महिला मोर्चातर्फे भजनी मंडळांचा सत्कार संपन्न

✍संतोष मेश्राम✍
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
( ग्रामीण )-9923497800
चंद्रपूर :- सविस्तर वृत्त या प्रमाणे आहे भजन मंडळाचे भक्तिभाव हरिपाठाच्या माध्यमातुन देवनामाचा केलेला जप व त्या माध्यमातुन निर्माण झालेले भक्तीमय वातावरण यामुळे मला वेगळया विश्वात गेल्याची अनुभूती झाली. भजनी मंडळाच्या महिलांनीश्रोत्यांच्या हॄदयापर्यंत भक्तीभाव पोहचविला. भजनांच्या माध्यमातून भाविकांच्या मनाला समाधान देण्याचे मोलाचे कार्य भजनी मंडळानी केले आहे असे प्रतिपादन विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
दिनांक ३ ऑक्टोंबर रोजी भाजपा महिला मोर्चा चंद्रपूर जिल्हा महानगर शाखेतर्फे आयोजित भजनी मंडळांचा सत्कार व हरिपाठ कार्यक्रमात आ. सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रमोद कडु, भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, उपमहापौर राहूल पावडे, महानगर महिला मोर्चा अध्यक्षा सौ. अंजली घोटेकर, सुभाष कासनगोट्टूवार, ब्रिजभूषण पाझारे, रविंद्र गुरनुले, नामदेव डाहूले, शिला चौहान, प्रज्ञा बोरगमवार, राजीव गोलीवार, अरूण तिखे, प्रमोद शास्त्रकार, विठ्ठलराव डूकरे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
यावेळी बोलताना आ. मुनगंटीवार पुढे म्हणाले, ज्याप्रमाणे ताप मोजण्यासाठी आपण थर्मामीटर वापरतो तसेच जर हवेतील भक्ती मोजण्यासाठी यंत्र असते तर १०० टक्के भक्तीमय वातावरणाची नोंद आज झाली असती. योगाचे अनेक प्रकार मी अनुभवले. अलीकडे नृत सारखे प्रकार घडला मला वेगवेगळ्या विश्वास गेल्याची अनुभूती झाली हदयपर्यंत भक्तिभाव पोहचविले मोलाचे कार्य भजन मंडळानी केले आहे.