नागपुर: हिंदू मुलीला कागदोपत्री बनविले मुस्लीम, तरुणान केल तीच धर्मपरिवर्तन प्रकरण?

48

नागपुर: हिंदू मुलीला कागदोपत्री बनविले मुस्लीम, तरुणान केल तीच धर्मपरिवर्तन प्रकरण?

● ती तरुणी हिंदूच असल्याचा उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्वपुर्ण निकाल.
● बनावटी कागदपत्राने बनावटी लग्न आणि धर्मपरिवर्तन.

नागपुर: हिंदू मुलीला कागदोपत्री बनविले मुस्लीम, तरुणान केल तीच धर्मपरिवर्तन प्रकरण?
नागपुर: हिंदू मुलीला कागदोपत्री बनविले मुस्लीम, तरुणान केल तीच धर्मपरिवर्तन प्रकरण?

✒युवराज मेश्राम ✒
नागपुर जिल्हा प्रतिनिधी
📲 9923296442 📲

नागपूर :- विदर्भातील अमरावती मधून एक खळबळजनक बातमी समोर आली होती. त्यामूळे सर्वीकडे संताप व्यक्त करण्यात आला होता. एका युवकाने आपल्या घराशेजारी राहत असलेल्या तरुणीच्या मैत्रिचा गैरफायदा घेत तिच्याजवळून गोडीगुलाबीनं कागदपत्र मागून घेतले. त्या कागदपत्राचा आधारावर त्याने कागदोपत्री बनावटी लग्न प्रमाणपत्र तयार केलं. त्यानंतर तीचं कागदोपत्री धर्मपरिवर्तनही केलं. याची माहिती माहीत होताच त्या तरुणीचा पायाखालची जमीन सरखली. मग त्या तरुणीने कोर्टात धाव घेतली. आता ती हिंदूच असल्याचा महत्वपुर्ण निकाल उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं दिला आहे.

आमीर नावाचा एका तरुणीशी मैत्री होती. एकच परिसरात राहत असल्यामुळे त्यांचे ऐकमेकांच्या घरी जाणे येणे होते. आमीरनं तिला लग्नाची मागणी घातली. तिने प्रस्ताव धुळकावला. तीनं त्याच्या घरी जाणेयेणे बंद केले. आमीरच्या बहिणीनं तिला विनंती केली. म्हणून तीनं माघार घेतली. 2012 मध्ये लायसन्स काढून देण्यासाठी तिच्याकडून काही कागदपत्र मागितले. तीनं रेशनकार्ड, छायाचित्र, महाविद्यालयाचे ओळखपत्र सारं काही दिलं. त्या कागदपत्राच्या आधारे आमीरनं तिच्याशी लग्न झाल्याचं खोटे प्रमाणपत्र मिळविले. त्यानंतर त्याने तिचे धर्मपरिवर्तनाचे प्रमाणपत्रही तयार केले.

आपल बनावती लग्न प्रमाणपत्र आणि धर्मपरिवर्तनाचे प्रमाणपत्रही बनवल्याची बाब तिच्या लक्षात आली. तेव्हा तिने याची माहिती कुटुंबीयांना दिली. आमीरविरुद्ध पोलिसांत तक्रार नोंदविली. आमीरचे त्रास वाढतच होते. शेवटी तीनं कुटुंब न्यायालयात याचिका दाखल केली. मी अविवाहित असून, लग्नाचे प्रमाणपत्र खोटे असल्याचं सांगितलं. 30 ऑगस्ट 2018 रोजी एक निर्णय देण्यात आला. त्यानुसार कुटुंब न्यायालयानं पीडितेला दिलासा दिला. या तरुणीचे आमीरसोबत लग्न झाले नाही. ती अविवाहित आहे, असे न्यायालयानं जाहीर केलं. त्या निर्णयाविरोधात आमीरनं उच्च न्यायालयात अपील दाखल केले. ते अपील उच्च न्यायालयानं फेटाळून लावलं. जुनाच निर्णय
कायम ठेवला. उच्च न्यायालयात न्यायमूर्तीद्वय अतुल चांदूपकर व गोविंद सानप यांनी हा निर्णय दिला. त्यामुळं तरुणीला दिलासा मिळाला.