खासदार डॉ.नामदेव किरसान यांच्या उपस्थितीत गोसेखुर्द च्या पाण्यासाठी वैनगंगा नदी पात्रात काँग्रेसचे ठिय्या आंदोलन
एक आठवड्याच्या आत पाणी न सोडल्यास मुख्यमंत्र्याच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांचा ईशारा
काँग्रेस विधिमंडळ नेते आमदार विजय वडेट्टीवार, आमदार रामदास मसराम यांची उपस्थिती व मार्गदर्शन
✍️लुकेश कुकडकर✍️
गडचिरोली तालुका प्रतिनिधी
मो 8999904994
गडचिरोली : गडचिरोली – चंद्रपूर जिल्ह्याची जीवनदायीनी समजल्या जाणाऱ्या वैनगंगा नदीचे पात्र कोरडे पडले असून नदी काठावरील पाण्याची पातळी खालावली असून शेतकऱ्यांना शेती करायला अडचणीचा सामना करावा लागत आहे या सोबतच नदी काठावरील गावातील भूजल पातळी कमी झाल्याने अनेक गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्याच्या अडचणी सामना करावा लागत असून पाळीव प्राणी, जंगली जनावरे यांनाही पिण्याच्या पाण्यासाठी भटकावे लागत असल्याने गोसिखुर्द धरणाच्या पाण्याचा विसर्ग वैनगंगा नदीत करण्यात यावा या प्रमुख मागणीस जिल्ह्यातील इतर मागन्यांना घेऊन गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या नेतृत्वात गडचिरोली -चंद्रपूर रोड वरील वैनगंगा नदीच्या पात्रात ठिय्या आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनास प्रामुख्याने काँग्रेस विधिमंडळ गट नेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजयभाऊ वडेट्टीवार, गडचिरोली -चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव किरसान, आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांनीही उपस्थिती दर्शविली व मार्गदर्शन करून संबंधित अधिकाऱ्यांशी भ्रमनध्वनी द्वारे संपर्क करून लवकरात लवकर नदी पात्रात पाणी सोडण्यासंदर्भात कार्यवाही करण्याचे कळविले.
एक आठवड्याच्या आत नदी पात्रात गोसिखुर्द चे पाणी न सोडल्यास मुख्यमंत्र्याच्या घरसमोर ठिय्या आंदोलन करण्याचा ईशारा काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी दिला.
यावेळी प्रदेश सचिव पंकज गुड्डेवार, युवक काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष ऍड. विश्व्जीत कोवासे, शहर अध्यक्ष सतीश विधाते, महिला काँग्रेस अध्यक्ष ऍड. कविताताई मोहरकर, जि. प. माजी उपाध्यक्ष तथा कुरखेडा तालुकाध्यक्ष जीवन पा. नाट, तालुकाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, वसंत राऊत, प्रमोद भगत, राजेंद्र बुल्ले, जिल्हा काँग्रेस चे जेष्ठ नेते शँकरराव सालोटकर, प्रभाकर वासेकर, युवक काँग्रेस अध्यक्ष नितेश राठोड, अनुसूचित जाती सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, अब्दुल पंजवानी, नेताजी गावतुरे, दिवाकर निसार, भूपेंश कोलते, रुपेश टिकले, रमेश चौधरी, नितीन राऊत, वामनराव सासाकडे, दामदेव मंडलवार, दत्तात्र्यय खरवडे, अनिल कोठारे, दिलीप घोडाम, सुभाष कोठारे, नितीन राऊत, नरेंद्र गजपुरे, मुन्ना गोंगले, शालिक पत्रे, विजय सुपारे, ढिवरू मेश्राम, उत्तम ठाकरे, जितेंद्र मुनघाटे, जावेद खान, घनश्याम मूरवतकर, मिथुन बाबनवाडे गौरव येणप्रेड्डी वार, विपुल येलट्टीवार, कुणाल ताजने, प्रफुल बारसागडे, तेजस कोंडेकर, अमर नवघडे, रवी मेश्राम, चंद्रशेखर धकाते सह मोठ्या संख्येने शेतकी व जिल्ह्यातून आलेले गावकरी यावेळी उपस्थित होते. तसेच आंदोलनात इतर मागण्या सुद्धा मागण्यात आले त्यामध्ये गडचिरोली येते होणाऱ्या विमानतळाकरीता सुपीक जमिन अधिग्रहित न करता त्यासाठी इतर शासकीय किंवा वनजमिनीचा वापर करण्यात यावा.
भेंडाळा त.चामोर्शी परीसरातील MIDC करिता प्रस्तावित अतिरिक्त क्षेत्र स्थापना करण्याकरिता शासनाने अवलंबिलेले धोरण शेतकऱ्याला देशोधडीला लावणारे असून शेतकर्यांशी चर्चा केल्याशिवाय जागा अधिग्रहीत करू नये.
कोटगल बँरेज करिता अधिग्रहीत करण्यात आलेल्या शेत जमिनीचा मोबदला संबधित शेतकर्यांना मिळाले नसून, योग्य तो मोबदला त्वरित देण्यात यावा व जे शेती बारमाही पाण्याखाली बुडीत क्षेत्रात येते अश्या शेतीस अतिरिक्त मोबदला देण्यात यावा.
मनरेगा अंतर्गत काम करणाऱ्या मजुरांचे थकीत असलेले मजुरीचे पैसे त्वरित देण्यात यावे.
वडसा – गडचिरोली नवीन ब्रॉडगेज रेल्वे लाईन प्रकल्पाकरिता अधिग्रहीत करण्यात येणाऱ्या जमीनधारक सर्व शेतकऱ्यांना नवीन दरानुसार जमिनीचा मोबदला देण्यात यावा.