विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! कोरोनामुक्त भागात 8वी ते 12वीचे वर्ग सुरु होणार

✒आशीष अंबादे ✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
मिडीया वार्ता न्यूज वर्धा
विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! कोरोनामुक्त भागात 8वी ते 12वीचे वर्ग सुरु होणार
महाराष्ट्र शासनानं याबाबत एक शासन निर्णय जारी केला आहे
मुंबई : राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा आलेख ओसरत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण विभागानं राज्यातील कोरोनामुक्त भागातील 8 वी ते 12 वीचे वर्ग सुरु करण्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र शासनानं याबाबत एक शासन निर्णय जारी केला आहे. ग्रामीण भागात कोरोनामुक्त गावातील ग्रामपंचायतीनं त्यांच्या अखत्यारीत असणाऱ्या गावातील इयत्ता 8 वी ते इयत्ता 12 वीचे वर्ग सुरु करण्याबाबत पालकांशी चर्चा करुन ठराव करावा, असं यात नमुद करण्यात आलं आहे.
मार्गदर्शक सूचना
शाळेत विद्यार्थ्यांना टप्याटप्याने बोलवण्यात येणार
कोविड संबंधी नियमांचे पालन करावे लागणार
एक बाकावर एक विद्यार्थी बसवता येणार दोन बाकांमध्ये सहा फूट अंतर
एका वर्गात जास्तीत जास्त 15 ते 20 विद्यार्थी
सतत हात साबणाने धुणे,मास्क घालणे हे नियम पाळवे लागणार
कोणतीही लक्षण आढळल्यास विद्यार्थ्यांना घरी पाठवणार
लगेच कोरोना चाचणी करावी लागणार
संबंधित शाळेतील शिक्षकांची राहण्याची व्यवस्था त्याच गावात करावी किंवा त्यांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्था न वापरण्याची दक्षता घ्याव
एखाद्या शाळेत क्वारंटाईन सेंटर असल्यास स्थानिक प्रशासनाने ते इतर ठिकाणी स्थानापन्न करावे
स्थानिक प्रशासनाने अशा शाळेचे हस्तांतरण शाळा व्यवस्थापनाकडे करण्यापूर्वी त्याचे पूर्णत: निर्जंतुकीकरण करावे.
कोरोना संबंधी सर्व आवश्यक ती खबरदारी घेण्यात यावी. शासनानं जारी केलेल्या कार्यपद्धतीचं काटेकोरपणानं पालन करावं, असं शासन निर्णयात सांगण्यात आलं आहे.