छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
अहमदनगर:- महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये आजकाल जास्तच वाढ झालेली पाहायला मिळत आहे. अत्याचार, छेडछाड, विनयभंग अशा घटना घडू लागल्याने महिलांचे अस्तित्व धोक्यात येऊ लागले आहे.
असाच एक प्रकार जिल्ह्यात घडला आहे. सासरच्या जाचाला कंटाळून मिरगाव येथील महिलेने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याबाबत पोलीस ठाण्यात सागर बळीराम यादव यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सासरी नांदत असताना पती ,दीर व सासूकडून मानसिक व शारीरिक छळ केल्याने चैताली रमेश मस्के विषारी पदार्थ सेवन केल्याने शनिवारी 12 वाजेच्या दरम्यान शिर्डी येथील साईनाथ रुग्णालयात उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला आहे.
यावरून सासू अल्का मच्छिंद्र म्हस्के, पती रमेश मच्छिंद्र म्हस्के ,दीर सुधीर मच्छिंद्र म्हस्के यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोते प्रकाश गवळी, दशरथ मोरे, नितीन जगताप अधिक करत आहे.