जॉय सामाजिक संस्थेला राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ठ संस्था पुरस्कार प्रदान
पूनम पाटगावे
जोगेश्वरी मुंबई प्रतिनिधी
मो. नं. ८१४९७३४३८५
जोगेश्वरी :- जॉय सामाजिक संस्था, मुंबई यांना नुकतेच राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ठ संस्था पुरस्कार २०२२ बदलापूर येथे प्रमुख पाहुण्याच्या हस्ते प्रदान करण्यात आला. जनजागृती सेवा समिती, महाराष्ट्र या संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर यांनी सांगितले की, समाजात अनेक प्रकारे चांगले कार्य करणाऱ्या सामाजिक संस्थांचा आम्ही आमच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त पुरस्कार देऊन सन्मान करीत आहोत ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे.
जॉय संस्था मागील अनेक वर्षांपासून राज्यात सातत्याने समाजातील गोरगरीब, वंचित, आदिवासी, दिनदुबळे, रोजंदारी कामगार आदी घटकासाठी कार्य करीत असून प्रामुख्याने त्यांचा फोकस हा विध्यार्थांवर राहिला आहे. आजही त्यांचे काम जोमाने सुरु आहे. ” आमच्या संस्थेच्या कार्याची दखल घेऊन आम्हाला हा मानाचा पुरस्कार मिळत असल्याने आमची जबाबदारी आणखी वाढली असून, पुरस्कार हे अधिक जोमाने काम करण्यासाठी ऊर्जा देत असतात. आम्ही यापुढेही नक्कीच समाजासाठी कार्य करीत राहू, असे जॉय संस्थेचे संस्थापक श्री. गणेश हिरवे यांनी पुरस्कार स्विकारल्यानंतर सांगितले”.
या संस्थेतील चंद्रशेखर सावंत, भूषण मुळे, योगिता हिरवे, असुंता डिसोझा, मीना भूतकर, प्रियांस हिरवे आदी जॉय चे सभासद पुरस्कार स्वीकारण्यासाठी उपस्थित होते. यावेळी जॉय संस्थेला सहकार्य करणाऱ्या देणगीदार व हितचिंतकांचे हिरवे सरांनी आभार मानले व पुरस्कार जरी संस्थेला मिळाला असला तरी तो संस्थेचे हितचिंतक, देणगीदार व सभासद यांचा असल्याचे सांगितले. सदर कार्यक्रमप्रसंगी दिलीप नारकर, प्रेरणा गावकर, राजेश कदम आदी मान्यवर पाहुणे आणि जनजागृती चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.