50 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कारानंतर, गुप्तांगात लोखंडी रॉड टाकून तिची केली हत्या.
निर्भया प्रकरणाची आठवण व्हावी इतक्या क्रूरपणे उत्तर प्रदेशातील बदायूँ जिल्ह्यात 50 वर्षे वयाच्या एका महिलेवर रविवारी सामूहिक बलात्कार करण्यात आला व तिची हत्या करण्यात आली. तिच्या गुप्तांगात लोखंडी रॉड घुसविण्यात आली. याप्रकरणी एका पुजाऱ्यासह तिघांवर पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून, दोघांना अटक केली आहे.
पीडितेची डाव्या बाजूची बरगडी, डावा पाय आणि फुफ्फुसांना इजा पोहोचल्याचेही यातून निष्पन्न झाले आहे. पाशवी बलात्कारानंतर अति रक्तस्त्राव आणि जबर धक्क्याने या महिलेचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
उत्तर प्रदेश:- उत्तर प्रदेशच्या बदायूमध्ये एका 50 वर्षीय आंगनवाडी कर्मचारी असलेल्या महिलेवर सामूहिक बलात्कारानंतर तिची क्रूर हत्या करण्यात आलीय. सामूहिक बलात्कारानंतर महिलेला मारहाण करण्यात आली. धक्कादायक म्हणजे, पीडित महिलेच्या शरीरात खासगी अंगांत लोखंडी रॉड घुसवल्याचंही समोर आलंय. मृत महिला आंगनवाडी सहाय्यक म्हणून काम करत होती. 3 जानेवारी सायंकाळी ही महिला मंदिरात पूजेसाठी गेली होती. या दरम्यान मंदिरात उपस्थित पुजाऱ्यासहीत तीन आरोपींनी महिलेवर सामूहिक बलात्कार केला. 3 जानेवारी रोजी रात्री आपल्या गाडीतून पीडित महिलेचा रक्तबंबाळ मृतदेह तिच्या घराबाहेर फेकून आरोपी तिथून पसार झाले होते.
“उघैती पोलीस ठाण्याच्या हद्दीत 50 वर्षीय महिलेचा मृतदेह संदिग्ध अवस्थेत आढळला होता. पोस्टमॉर्टम अहवालाच्या आधारावर कलम 302 आणि 376 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दोन आरोपींना अटक केली आहे. तसंच या प्रकरणात प्राथमिक तपास करत असताना निष्काळजीपणा केल्याप्रकरणी पोलीस ठाण्याच्या प्रभारीला निलंबित करण्यात आले आहे.”
महिलेच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी संध्याकाळी महिला मंदिरात पूजा करण्यासाठी गेली होती. पण बराच वेळ घरी परतली नसल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली. “रात्री अकरा वाजता मंदिराचे पुजारी गंभीर अवस्थेत महिलेला घरी घेऊन आले. महिलेच्या शरीरातून रक्तस्त्राव होत होता. रक्तस्त्राव जास्त झाल्याने महिलेचा मृत्यू झाला. पुजारी, सत्यनारायण सोबत वेदराम आणि ड्रायव्हर जसपाल होते.”
सुरुवातीला पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवून घेतली नाही असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
मंगळवारी 5 जानेवारी पोस्टमॉर्टमचा अहवाल आल्यानंतर सामूहिक बलात्कार आणि निर्घृण हत्या केल्याचे स्पष्ट झाले त्यानंतर पोलिसांनी एफआयआर नोंदवला. बुधवारी 6 जानेवारी पोलिसांनी या प्रकरणात दोन जणांना अटक केली. मुख्य आरोपी पुजारी सत्यनारायण फरार आहे.
बदायूचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.यशपाल यांनी मीडियाशी बोलताना पोस्टमॉर्टम अहवालाची माहिती दिली.
डॉ. यशपाल यांनी सांगितले, “पोस्टमॉर्टम अहवालानुसार महिलेच्या खासगी भागात जखमा आणि फ्रॅक्चर आहे. एका पायालाही फ्रॅक्चर आहे. शरीराच्या इतर भागांवरही जखमा आहेत. यामुळे रक्तस्त्राव जास्त झाला आणि पीडित महिला शॉकमध्ये गेली. यात त्यांचा मृत्यू झाला. प्राथमिकदृष्ट्या बलात्कार आहे असे दिसते कारण खासगी जागेवर जखमा आहेत. पुढील तपासानंतर अहवाल येईल आणि अधिक बाबी स्पष्ट होतील.”
उघैनी पोलीस ठाण्यातील पोलिसांनी सुरुवातीला याला अपघाताचे स्वरुप देण्याचा प्रयत्न केला असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. पोस्टमॉर्टमचा अहवाल आल्यानंतर पोलिसांनी हत्या आणि सामूहिक बलात्काराचा गुन्हा नोंदवला. पीडित महिलेच्या मुलाने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी रात्रीच पोलिसांना कळवले पण पोलीस दुसऱ्या दिवशी घटनास्थळी पोहचली.
पुजाऱ्याचा जबाब दिशाभूल करणारा
मुख्य आरोपी मंदिराचे पुजारी सत्यनारायण दोन दिवस मीडियाला प्रतिक्रिया देत होते. पीडित महिलेचा मृत्यू विहिरीत पडल्याने झाला असा दावा त्यांनी मीडियाला प्रतिक्रिया देताना केला. कुटुंबीय सामूहिक बलात्कार आणि हत्या झाल्याचा आरोप करत असूनही पोलिसांनी पुजाऱ्याच्या माहितीच्या आधारावर सुरुवातीला कारवाई केली, अशी टीका करण्यात येतेय.
मीडियाशी बोलताना पुजाऱ्याने सांगितले होते, “महिला विहिरीत पडली होती. मी वेदराम आणि जसपाल यांना मदतीसाठी बोलवले. त्यांच्या मदतीने महिलेला बाहेर काढले तेव्हा त्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आम्ही त्यांना घरी घेऊन गेलो.” पोलिसांनीही पुजाऱ्याच्या या माहितीवर सुरुवातीला विश्वास ठेवला असा आरोप करण्यात येतोय. पुजारी सांगत असलेल्या विहिरीपर्यंत पोहचणे कठीण असल्याचे स्थानिक लोक सांगतात. त्यामुळे पीडित महिला विहिरीत पडल्याच्या शक्यतेवर कुणालाही विश्वास बसत नव्हता.