महाराष्ट्रात येणारे ऑक्सिजन टँकर्स कट करुन गुजरातला पळवत होते, पोलिसांनी कट केला उघड.
महाराष्ट्राचे ऑक्सिजन गुजरातला नेणारे महाराष्ट्रद्रोही कपळकवते कोन?
✒मुकेश चौधरी, विदर्भ ब्युरो चीफ✒
नागपूर,दि.7 मे:- एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. त्यामुळे संपुर्ण महाराष्ट्र एकच खळबळ उडाली आहे. महाराष्ट्राच्या वाट्याला मीळणारे ऑक्सिजनचे चार टँकर्स गुजरातला नेण्याचा कट करण्यात आला होता, हा कट नागपुर पोलिसाच्या तरफतेमुळे उघडकीस आला आहे.
महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. त्याचसोबतच वैद्यकीय सेवा, ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला. यामुळे महाराष्ट्र शासनाकडून विविध ठिकाणांहून ऑक्सिजन मागवण्यास सुरूवात केली. मात्र, असे असताना महाराष्ट्राच्या वाट्याचे ऑक्सिजन गुजरातला पळवून नेण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
भिलाई येथून महाराष्ट्रातील नागपूरला वैद्यकीय ऑक्सिजन घेऊन चार टँकर्स येत होते. मात्र, हे टँकर्स गुपचूप गुजरातच्या दिशेने नेत असल्याचा प्रकार समोर आला. 5 मे रोजी दोन ऑक्सिजन टँकर्स गोंदिय जिल्ह्यातील देवरी बॉर्डरवर पकडण्यात आले तर 6 मे रोजी दोन टँकर्स औरंगाबाद आणि जालना या दरम्यान पकडण्यात आले आहेत. आता चारही ऑक्सिजनचे टँकर्स हे नागपूर प्रशासनाने ताब्यात घेतले आहेत. महाराष्ट्राच्या वाट्याचा ऑक्सिजन तेथे कुणाच्या सांगण्यावरुन नेण्यात येत होता असा प्रश्न उपस्थित होत आहे.