वर्ध्या जिल्हात सरास आमली पदार्थाची तस्करी, गांजाचे झुरके ओढणारे ११ अटकेत
प्रतिनिधी
वर्धा :- जिल्हात आज मोठ्या प्रमाणावर आमली पदार्थाची तस्करी आणी विक्री होत असल्याचे पुढे आले आहे. आज जिल्हातील युवा मोठ्या प्रमाणात गांजा, अफिम, भंग सरख्या आमली पदार्थाचे बळी पडत आहेत.
आतापर्यंत गांजा विक्री करणाऱ्यांवर कारवाई झाली हे सर्वश्रुत होते. मात्र, वर्ध्यातील पोलिसांनी चक्क गांजाचे झुरके ओढणाऱ्यांवरही कारवाई केली. ११ युवकांना अटक केली असून अशा प्रकारची ही पहिलीच कारवाई आहे. हा गांजा दक्षिणेतील राज्यातुन वर्ध्यात येत असल्याची लिंक पोलिसांना सापडली असून उपविभागीय पोलीस अधीकारी पियूष जगताप याबाबत सखोल चौकशी करीत आहे.
अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणाने वेगळे वळण घेत अनेक अभिनेता- अभिनेत्रींचे ‘ड्रग्ज’ कनेक्शन पुढे आले. त्या पार्श्वभूमीवर उपविभागीय पोलीस अधिकारी पियूष जगताप यांनी गांजा पिणा-यांच्या मुसक्या आवळण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे ठरविले. त्यानुसार रामनगर पोलीस ठाणे, शहर पोलीस ठाणे आणि सावंगी पोलिसांनी शहरासह लगतच्या परिसरात असलेल्या सर्कस मैदान, स्वावलंबी मैदान, तुकडोजी मैदान, रेल्वे लाईन परिसर, साटोडा टी-पॉर्इंट परिसर आदी ठिकाणी छापे मारुन ११ युवकांना गांजा ओढताना रंगेहात अटक केली. पोलिसांनी शेख मोसीम शेख कासम कनोजे, प्रवीण देविदास परसगाले, निखील अनंत कारमोरे, शेख आसीफ शेख नसीर, रुखेश असलम शेख रफीक, आसीफ खाँ पठाण, शेख अनीस शेख अहमद, पंकज शिवदास झगडकर, बॉबी दिलीप महेशगौरी, गणेश गंगाधर मन्ने यांना अटक करीत त्यांच्यावर गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ, या कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले.
तीन दिवस चाललेली ही विशेष मोहीम राबविण्यापूर्वी संबंधित ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक यांचे प्रशिक्षण घेण्यात आले. कशी कारवाई करायची, लघवीचे नमूने कसे घ्यायचे ते कुठे पाठवायचे, गांजा सेवन करणारा ओळखायचा कसा, याचे प्रशिक्षण देण्यात आले.