महीला सुरक्षित तर देश सुरक्षित, देश सुरक्षित तर जग सुरक्षित

रमेश कृष्णराव लांजेवार

मो.नं.9921690779

8 मार्च आंतरराष्ट्रीय महीला दीवस हा महीलांसाठी प्रेरणादायी ठरला पाहिजे.कारण जगातील महिलांनी पुर्वीच्याकाळी काय संघर्ष केला आणि आता कसा संघर्ष करावा लागत आहे याची आठवण 8 मार्चच्या यानिमित्ताने दिसून येते. महीला दिनाच्या निमित्ताने महीलांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारने व आम नागरिकांनी स्विकारली पाहिजे.कारण महीला ही प्रत्येकाची आई, मुलगी,बहिण,पत्नी,वैनी, आत्या,मामी,माउशी,आजी,सुन,सासु,काकु इत्यादी मानसन्मानाची उपमा आहे त्याचे पालन सर्वांनीच करायला हवे. कारण संस्कारांची मुख्य धनी महिलाच आहे.त्यामुळे संस्कारांचा सन्मान करणे सर्वच लहान -मोठ्यांचे प्रथम कर्तव्य आहे.यामुळे महीलांमध्ये व समाजामध्ये मोठी उर्जा निर्माण होवून एक नवीन चालना मिळुन शकते.

देशात किंवा जगात महीलांची एक महत्वपुर्ण भुमिका असते.आज देश स्वतंत्र्या पासुन तर  देशाच्या विकासापर्यंत महीलांचा मोठा हातभार लागला आहे.देश विकासाच्या दृष्टीकोणातुन आज महीला अग्रेसर आहेत. परंतु 21 व्या शतकात  महीला स्वतःला असुरक्षित समजतात ही चिंताजनक बाब आहे.आज महीला सुरक्षा विभाग,खेळ विभाग, उद्योग क्षेत्र आणि अनेक सरकारी व खासगी क्षेत्रात महिला मोठ्या दीसुन येतात. अनेक निवडणुकांमध्ये महीलांसाठी आरक्षणसुध्दा आहे. परंतु पुरूष प्रधान देशात राजकीय पुढाऱ्यांनी महीलांना अजुनपर्यंत पुर्ण स्वतंत्र दील्याचे दीसत नाही.लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये अजुन पर्यंत महीलांना सरकारने आरक्षण जाहीर केले नाही.ही महीलांच्या प्रती शोकांतिकाच म्हणावी लागेल.खालच्या स्तरावरील निवडणुकांमध्ये महीलांना आरक्षण आहे ही स्वागतार्ह बाब आहे.परंतु उच्चस्तरीय राजकारणात सरकारने महीलांना कोसो दुर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.

भारतात रनरागीनी झाशीची राणी लक्ष्मीबाई पासुन तर आतापर्यंत महीलांनी देशाला स्वातंत्र्याकरीता, सुजलाम्-सुफलाम करण्याकरीता आणि देशाला विकासाच्या नविन शिखरावर नेण्याचे काम भारतीय महीलांनी नेहमीच केले आहे ही आनंदाची,गौरवाची व अभिमानास्पद बाब आहे.त्याच प्रमाणे देशहीताच्या कामासोबत भारतीय संस्कृतीचे जतन कसे केले पाहिजे याची शिकवणसुध्दा “महीलांपासुनच”सर्वांना मिळत असते.कथेच्या माध्यमातून किंवा गोष्टींच्या आधारे वृध्द महिला बालगोपालांना “संस्कृतीचा”पाठ शिकवित असतात.म्हणुनच देश घडविण्याकरीता पुरूषांचा जीतका वाटा आहे तीतकाच वाटा महीलांचा आहे.त्यामुळे 8 मार्च हा दीवस महीलांसाठी नविन दीशा ठरणारा सिध्द व्हायला पाहिजे.

सेवाभावी संस्था, डॉक्टर,नर्स,पायलट, वकील,जज, पोलिस विभागा आणि आता महीलांना आर्मीमध्येसुध्दा मोठ्या प्रमाणात प्राधान्य देण्यात येत आहे.म्हणजेच आजची महीला पुरूषांच्या बरोबरीने चालुन देशाला नवीन दीशा देण्याचे काम करीत असल्याचे मी समजतो.पुर्वी महीलांना अनेक क्षेत्रात स्वतंत्र नव्हते. परंतु आधुनिक युगात महीला सक्षम आहे.त्यामुळे संपूर्ण क्षेत्रात महिला अग्रेसर असल्याचे दिसून येते.महीला राष्ट्रपती, महीला मुख्यमंत्री,महीला प्रधानमंत्री, लोकसभा अध्यक्ष, अंतराळवीर,इत्यादी महत्त्वपूर्ण पदांवर महीला विराजमान होत्या, आहे आणि पुढेही राहु शकतात याला नाकारता येत नाही.महीलांच्या या महत्त्वपूर्ण पदांमुळे भारतात महीलांनी इतिहास घडविला आहे. माओवादग्रस्त भागासाठी आदीवासी भागातील माडिया जमातीतील डॉ.कोमल मडावी ही एक प्रेरणादायी महीला ठरली तीची स्तुती कराल तीतकी कमी पडेल.

आज भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात महिलांनी आपले नाव लौकीक केले आहे.राजकारण, समाजकारण,सुरक्षा,चित्रपट सृष्टी,खेळजगत,आर्मि, वैज्ञानिक, शास्त्रज्ञ, वैमानिक इत्यादीसह अनेक क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर महीलांनी भरारी मारली आहे आणि प्रत्येक देशातील महीलांनी आप आपल्या देशाचे नाव लौकीक करून सुवर्ण अक्षरांनी कोरलेले आहे.भारतीय महीलांनी सर्वच स्तरात उंच भरारी मारली आहे त्याचसोबत भारतीय संस्कृती टीकवुन ठेवण्याची महत्वपूर्ण भुमिका भारतीय महिलांचीच आहे.महीलांचा वाढता विकास ही बाब भारताच्या दृष्टीकोनातून व जगाच्या दृष्टीकोनातून स्वागतार्हबाब आहे.

परंतु भारतात महीलांवर वाढते अत्याचार रोखण्यासाठी देशातील राज्य सरकारे असमर्थ असल्याचे दिसून येते.या करीता महीलांवरील वाढता अत्याचार पहाता सरकारने “फास्ट ट्रॅक”कोर्ट अंमलात आणुन महीलांवर होत असलेले अत्याचार यावर अंकुश लावला पाहिजे.कारण आजच्या(सोशल मिडियाच्या) मोबाईलच्या युगामुळे महीलांवरील अत्याचार वाढत आहे.कारण महीलांवरील अत्याचार पहातो किंवा ऐकतो तेव्हा अंगावर शहारे येतात अशा अनेक घटना भारतात घडलेल्या आहे.मुलींचे अपहरण किंवा त्यांची हत्या यावर पुर्णतः अंकुश लावण्याची गरज आहे.आंतरराष्ट्रीय महीला दीवसाच्या निमित्ताने महीलांच्या सुरक्षेला सर्वात जास्त प्राधान्य सरकारने द्यायला पाहिजे.”महीला सुरक्षित तर देश सुरक्षित,देश सुरक्षित तर जग सुरक्षीत” तेव्हाच खऱ्याअर्थाने आंतरराष्ट्रीय महिला दिनाला महत्त्व येईल.

मानवाने मानुसकीचे पालन केले तर महीलांवरील अत्याचारावर आपोआपच अंकुश लागु शकतो.ज्या प्रमाणे महीला मुलांचे संगोपन करते त्याचप्रमाणे महीलांच्या सुरक्षेची जबाबदारी मानवाने स्वीकारली पाहिजे.तेव्हाच महीला सुरक्षित राहू शकतात.कारण महीलांवरील अत्याचार हा गंभीर आणि चिंतेचा विषय आहे. त्यामुळे देशाच्या व जगाच्या दृष्टीकोनातून ही चिंतेची बाब आहे.आज भारताचा विचार केला तर  महीला अत्याचाराच्या लाखो केसेस कोर्टामध्ये प्रलंबित आहेत आणि महीलांवरील अत्याचाराच्या अनेक केसमध्ये “तारीख पे तारीख”असा लपंडाव सुरू आहे. त्यामुळे गुन्हेगारांना वेळेवर सजा व पिडीतेला वेळेवर न्याय मिळत नाही ही शोकांतिका आहे.यावरून स्पष्ट होते की आजच्या परिस्थितीत महीला सुरक्षित नाही.

8 मार्च महीला दीवसाचे औचित्य साधून भारतासह संपूर्ण जगाने महीला सुरक्षेचा “संकल्प”केला पाहिजे आणि महीलांच्या खांद्याला खांदा लावून बरोबरीची वागणूक दिली पाहिजे.महीलांचा सन्मान म्हणजे नारी जातीचा सन्मान,नारी जातीचा सन्मान म्हणजे देशाचा सन्मान,देशाचा सन्मान म्हणजे आंतरराष्ट्रीय महीला दीनाचा सन्मान.यातच खऱ्याअर्थाने महीला सशक्तीकरण दीसुन येईल.म्हणुनच म्हणतात “बेटी बचाव बेटी पढाव”. महीला देवी-देवतांच्या सान्नीध्यात राहुन आपला परीवार मंगलमय कसा राहील या दीशेने त्यांचे कार्य सुरू असते व संपूर्ण परीवाराची एक महीला आशेचे किरण घेऊन सर्वांना सावरण्याचा प्रयत्न करीत असते.त्यामुळे महीला उन्हात सावली,हीवाळ्यात उब देण्याचे काम परिवाराला करीत असते.त्यामुळे प्रत्येक महीलेला देवीच्याच रूपात पहायला पाहिजे.

आज रशिया -युक्रेन युध्दा दरम्यान आपला देश वाचवीण्यासाठी आरपारची लढाई लढत आहे. यासाठी मुख्यत्वेकरून त्यांच्या पत्नींनी व मुलींनी सैनिकांचे मनोबल वाढवीले आहे.म्हणजेच मानसाचे मनोबल व धौर्य वाढवण्यासाठी महीलांची अतुट शक्ती असल्याचे दिसून येते.असे माझे स्पष्ट मत आहे.आंतराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने महिलांना मी आग्रह व विनंती करतो की जगात व देशात वाढते प्रदूषण व निसर्गाचे डगमगते संतुलन पहाता आजच्या दिवसाला प्रत्येकांनी एकतरी वृक्ष लावले पाहिजे.यात पुरूषांचा सुध्दा सहभाग असावा.यामुळे एकाच दिवशी देशासह संपूर्ण जगात लाखोंच्या संख्येने वृक्ष लागवड होईल व आजचा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहला जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here