20 ते 22 वर्षांपासून कंत्राटी कामावर असणाऱ्याना कामगारांना कायमस्वरूपी सामावून घेण्याचे आदेश.
✒मनोज खोब्रागडे✒
चंद्रपूर / गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर:- कामगारांना किमान वेतन मिळावे, स्थानिकांना प्राधाण्याने रोजगार मिळावा, 20-22 वर्षापासून कार्यरत असणाऱ्या कंत्राटी कामगारांना सेवेत कायम करावे व नियमानुसार त्यांना सुविधा मिळावी या बाबीची पुर्तता करून घेण्यासाठी चंद्रपूर जिल्हा कामगार आयुक्तांना तपासणी करण्याचे निर्देश दिले.
कोरोना महामारी असताना उद्योजकांना पुर्ण क्षमतेने काम करण्याची सुट दिली आहे, उद्योजकांनीदेखील कोविड नियमांचे पालन करावे, कामगारांची कोरोना तपासणी व 45 वर्षावरील कामगारांचे लसीकरण करून घ्यावे, कामगारांची सुरक्षा ही उद्योजकांची जबाबदारी आहे.
जेथे जास्त प्रदुषण आहे, त्या ठिकाणी हवा शुद्धीकरण टॉवर बसविण्यासाठी सिएसआर निधीतून मदत करण्याचेह उद्योजकांना आवाहन केले. चंद्रपूर जिल्ह्यात उद्योग चालावे, ते आवश्यकच आहे पण प्रदुषण मात्र होवू नये यासाठी पर्यावरण विभागातील व संबंधित विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा केली.