प्रवाशांची सुरक्षा सर्वोपरी …..
प्रवास्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रवासी वाहतूक बसेसची योग्य तपासणी करा – आ. किशोर जोरगेवार
• जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यानंसोबत बैठक
🖋️ अश्विन गोडबोले
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
📱 8830857351
चंद्रपूर : 8 जुलै : -समृध्दी महामार्गावर झालेल्या बसच्या अपघातात २५ प्रवास्यांना आपला जिव गमवावा लागला. त्यामुळे प्रवासी बसेसच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरनीवर आला आहे. दरम्यान आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत प्रवासांच्या सुरक्षतेसाठी प्रवासी वाहतुक बसेसची फिटनेस तपासणी करुन वाहन आणि वाहकांचीही शारीरीक व मानसीक तपासणी करावी अशा सुचना संबधित अधिका-यांना केल्या.
मुंबई, नागपूर समृद्धी महामार्गावरून प्रवास करत असलेल्या एका खासगी बसच्या भीषण अपघातात २५ प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले. ही घटना प्रवासी वाहतूक बसेसमध्ये मानवी व तांत्रिक चुका झाल्यामुळे घडली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातून पुणे, औरंगाबाद तसेच मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगाना, आंध्रप्रदेश राज्यात लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या बसेसने प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामूळे अश्या दुर्दैवी घटनेची भविष्यात पुनरावृत्ती होऊ नये यासाठी जिल्ह्यात प्रवासी वाहतूक बस यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून नियमांचे पालण करणे गरजेचे आहे. वाहतुक बसेस या नियमांचे पालन करत नसेल तर त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, महामार्गावर चालणाऱ्या प्रवासी वाहतूक बसेस चालकांची मद्यप्राशन चाचणी करण्यात यावी, विमान सेवेत देण्यात येणाऱ्या आपातकालीन माहिती च्या धर्तीवर बस मध्ये प्रवास सुरु करतांना प्रवाशांना बस मधील आपातकालीन मार्गाचा वापर करण्याबाबत माहिती देण्यात यावी, आपातकालीन परिस्थितीत बस च्या काचा फोडण्यासाठी साहित्य ठेवण्यात यावे, प्रत्येक प्रवासी वाहतूक बस मध्ये अग्नीरोधक ठेवण्यात यावा, बसेस च्या टायर मध्ये नियमानुसार हवेचा दाब असल्याची खात्री करण्यात यावी, आदी सुचना यावेळी आ. जोरगेवार यांनी यावेळी अधिका-यांना केल्या.
या बैठकीला जिल्हाधिकारी विनय गौडा, जिल्हा पोलिस अधिक्षक रविंद्रसिंग परदेशी, सहायक परिवहण अधिकारी आंनद मेश्राम, सहायक मोटर वाहण निरीक्षक अमित काळे यांच्यासह यंग चांदा ब्रिगेडचे अल्पसंख्यांक विभाग शहर अध्यक्ष सलिम शेख, युवा नेते अमोल शेंडे, शिक्षण विभाग प्रमूख प्रतिक शिवणकर शहर संघटक विश्वजीत शाहा, विलास सोमलवार आदीची उपस्थिती होती.