राष्ट्रीय महामार्ग क्र-353 आलापली-सिरोंचा मार्गावर रेपणपली जवळ दोन ट्रक फसले
कमलापूर व्हाया राजाराम मार्ग सुरू

अमोल रामटेके
अहेरी तालुका प्रतिनिधी
9405855335
अहेरी:- गडचीरोली जिल्हा तसा आदिवासी जिल्हा म्हणुन ओळखला जाते. त्यामुळे शासन, प्रशासन आणि जनप्रतिनिधी नेहमी या जिल्हावर दुर्लक्ष करत आले. त्यामुळे या जिल्हाचा विकास कुठे तरी खुटला असल्याचे चित्र सर्वीकडे दिसून येते.
गडचीरोली जिल्हात रस्त्याची अवस्था तर फार बिकट आहे. रस्त्यात खड्डा की, खड्ड्यात रस्ता आहे हेच समजत नाही. राष्ट्रीय महामार्ग क्र.353 आलापली- सिरोंचा मार्गावरील रेपनपल्ली गोलाकर्जी मध्ये दोन ट्रक फसल्याने राष्ट्रीय महामार्ग बंद काही वाहने रेपनपल्ली कमलापुर व्हाया छल्लेवाडा राजाराम मार्गे वाहने जात आहेत. राष्ट्रीय महामार्गाची रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था असून जागोजागी खड्डे, वाहने फसणे अपघात होणे असे प्रकार सुरू आहे.