शेतकऱ्यांसमोर शेतीच्या मशागतीचा मोठा प्रश्न.
प्रा. अक्षय पेटकर प्रतिनिधी
वडणेर :- सतत च्या नापिकी मुळे आणि उत्पन्नावर आधारित योग्य भाव मिळत नसल्याने आणि शेत मजुरी चे रोजाचे भाव मोठया प्रमाणात वाढल्याने शेतकऱ्या समोर आता मशागत कशी करायची हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहेत. मोठया प्रमाणात शेती मध्ये सतत नापिकी होत असून शेतीचा उत्पादन खर्च खूप वाढला आहेत, त्यामुळे शेती हा व्यवसाय मोठया टोट्ट्यात असून शासनाने शेती उपयोगी लागण्याऱ्या सर्व वास्तूचे भाव मोठया प्रमाणात वाढवले आहेत. त्यामुळे जन सामान्य लोकांसमोर जीवन कसे जगावे ही मोठी समस्या निर्माण झाली आहेत. शेतकऱ्याची आर्थिक स्थिती कोलमोडल्या मुळे शेतीवर आधारित कर्ज फेडाचे कसे, जमिनीची मशागत करण्यासाठी आणि बी बियाण्यासाठी पैसा चा आण्याचा कुठून हा मोठा प्रश्न आज शेतकऱ्यासमोर उभा आहेत. शेतीला उत्पादनाला शासना कडून योग्य भाव मिळत नसल्याने देशात मोठया प्रमाणात शेतकरी आत्महत्या होत आहेत परंतु मायबाप सरकार चे देशाच्या पोशिंद्या कडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहेत.त्यामुळे या काळात शेती करणाऱ्या आणि शेतीवर आधारित असणाऱ्या लोकांन समोर मोठी समश्या निर्माण झाली आहेत.