लॉकडाउनमुळे बाजारपेठा बंद, शेतकऱ्याच मोठ नुकसान.

57

लॉकडाउनमुळे बाजारपेठा बंद, शेतकऱ्याच मोठ नुकसान.

लॉकडाउनमुळे बाजारपेठा बंद, शेतकऱ्याच मोठ नुकसान.
लॉकडाउनमुळे बाजारपेठा बंद, शेतकऱ्याच मोठ नुकसान.

✒आशीष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी✒
वर्धा/सेलू,दि.10 मे:- वर्धा जिल्हात कोरोना वायरसचा प्रादुर्भाव बघता प्रशासनाने संपुर्ण लॉकडाउन संचारबंदी लावली आहे. वर्धा जिल्ह्यातील सेलू घोराड येथील शेतकऱ्यांनी नगदी पीक म्हणून भोपळे (कोहळे) पिकवले. मात्र लॉकडाऊनमुळे बाजारपेठा बंद असल्याने हे भोपळे शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे त्यामुळे लाखो रुपयांचे नुसकान झाल्याचे समोर येत आहे.

वर्धा जिल्ह्यातील सेलू घोराड येथील शेतकऱ्यांनी नगदी पीक म्हणून भोपळे (कोहळे) पिकवले. मात्र संचारबंदी आणि लॉकडाऊनमुळे बाजारपेठा बंद असल्याने हे भोपळे शेतकऱ्यांच्या घरात पडून मातीमोल ठरण्याची भीती निर्माण झाली आहे.उन्हाळी पीक म्हणून बहुतांश शेतकऱ्यांनी शेतात कोहळ्याचे पीक घेतले होते. आता कोहळे बाजारात नेऊन दोन पैसे जवळ येईल ही आशा शेतकऱ्यांना होती. पण संचारबंदीमुळे आठवडी बाजार तर बंदच झाले पण मोठ्या प्रमाणात असणारे हे कोहळे जिल्ह्याच्या बाजार पेठेत दलालजवळ नेऊन विकल्या जाते पण जिल्हा बंदी असल्याने कोहल्याचे भाव गडगडले. त्या मुळे कोहळे विकून येणारे पैसे जर मोजल्या गेले तर लावलेला खर्च निघेनासा झाला आहे. शेतकऱ्यांजवळ शेतात साठवणूक करण्यासाठी व्यवस्था नाही. अश्यातच ढगाळ वातावरणामुळे व पावसाच्या आलेल्या सरीमुळे शेतकऱ्याला शेतातच कोहळे तडपत्रीचा आधार घेऊन झाकण्याचा वेळ आला आहे. मात्र संचार बंदीत वाढ झाल्यास कोहळ्याला नुकसान पोहचण्याची भीती जास्त आहे. त्या मुळे संचार बंदीत कोहळे अडचणीत सापडले आणि शेतकरी ऐन खरिपाच्या तोंडावर अडचणीत सापडले आहे.