वाघाच्या हल्ल्यात बैल ठार
हिंगणघाट तालुक्यात असलेल्या मानोरा शिवारातील घटना
करण विटाळे
हिंगणघाट ग्रामीण तालुका
प्रतिनिधी :- 8806839078
हिंगणघाट : -हिंगणघाट तालुक्यामध्ये येत असलेल्या मानोरा येथील रघाताटे नामक शेतकऱ्याने आपल्या शेतात चरायला सोडलेल्या बैलावर वाघाने अचानक हल्ला करून ठार केले.यामध्ये शेतकरी रघाताटे यांचे साठ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे आणि वाघाच्या दहशतीमुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाला हल्ल्याची माहिती मिळताच वनविभागाने घटनास्थळ गाठून पंचनामा करुन घेतला. व वाघाला जेरबंद करण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. मागील आठवड्यात पिंपळगाव शिवारात काही युवकांना बिबट्या आढळून आला. वनविभागाने बिबट्याचा शोध सुद्धा घेण्यात आला होता.
यामुळे हाच तर वाघ नाही ना असा प्रश्न परिसरातील नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे. म्हणून लवकरात लवकर वाघाला जेरबंद करण्यात यावं अशी मागणी नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे