वंचितचे प्रकाश आंबेडकर आणि संभाजीराजे एकत्र आले तर पेशवाई मातीमोल होईल: नाना पटोले

38

वंचितचे प्रकाश आंबेडकर आणि संभाजीराजे एकत्र आले तर पेशवाई मातीमोल होईल: नाना पटोले

वंचितचे प्रकाश आंबेडकर आणि संभाजीराजे एकत्र आले तर पेशवाईला मातीमोल होईल: नाना पटोले
वंचितचे प्रकाश आंबेडकर आणि संभाजीराजे एकत्र आले तर पेशवाईला मातीमोल होईल: नाना पटोले

✒नीलम खरात, मुंबई प्रतिनिधी ✒
मुंबई/अमरावती, 12 जून :- मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा सध्या महाराष्ट्र मोठा गाजत आहे. मराठा समाज आता आक्रमक होत असल्याचे चित्र आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्यावरून खासदार संभाजीराजे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते ऐड. बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीमुळे वेगवेगळ्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे. ‘जर प्रकाश आंबेडकर आणि संभाजीराजे एकत्र आले तर याचा फटका पेशवाईलाच बसणार आहे’ अशी बोचरी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर केली.

महाराष्ट्र कॉंग्रेसचे नेते नाना पटोले हे विदर्भाच्या दौऱ्यावर आहे. अमरावतीमध्ये पत्रकारांशी बोलत असताना कोरोनाची परिस्थिती आणि राज्यातील राजकीय परिस्थितीवरून भाजपवर निशाणा साधला आहे.

मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मराठा समाज आंदोलन करत आहे. संभाजीराजे यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, देवेंद्र फडणवीस यांच्यासह वंचित बहुजन विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली होती. संभाजीराजे यांनी वेगळा पक्ष काढणार असल्याची चर्चा आहे. पण येत्या निवडणुकीत वंचित आघाडी व संभाजीराजे एकत्र आल्यास त्याचा फटका पेशवाईला बसेल. शिवशाहीला बसणार नाही’, अशी टीका नाना पटोले यांनी केली.

‘कोरोनानंतर उद्भवणार्‍या आजारावर केंद्र सरकारकडे इंजेक्शन उपलब्ध असतानाही ते राज्याला देत नाही. आज राज्यात 50 हजार पोस्ट कोविडचे रुग्न असताना चार ते पाच हजार इंजेक्शन देतात व बाहेर या इंजेक्शनची काळा बाजारी केली जाते. यामुळे अनेकांना आपले जीव तर काहींना आपले अवयव गमवावे लागले आहेत. मात्र केंद्र सरकारला सामान्य माणसाची काही घेणे देणे नाही ते सामान्य माणसाच्या जीवनाशी खेळ करत असल्याची घणाघाती टीकाही नाना पटोले यांनी भाजपवर केली आहे.