पोलिसांच्या अनेकविध समस्या शासनाने सोडवाव्या सोडविता …. कुटुंबातील समस्या सोडविता येत नाही.
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी.
✍ त्रिशा राऊत✍
नागपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
मो.(9096817953)
नागपूर :- पोलीस विभागातील सर्व पोलीस बांधव सर्व सामान्य जनतेच्या सुरक्षिततेसाठी नेहमी सातत्याने जीवाची बाजी लावत आपले कर्तव्य बजावित असतात. भारतीय जनता वेगवेगळ्या प्रकारच्या अंधश्रद्धेच्या विळख्यात सापडली असल्याने , सण उत्सव दिवाळी आली पोलीस, होळी आली पोलीस, ईद आली यासारख्या अनेकविध जाती.. धर्मातील सामुहीक सण , उत्सवात पोलीस, शेकडो प्रकारचे राजकीय नेते आले ? पोलीस ! निरनिराळ्या कारणांनी हत्या झाली ? पोलीस ! शेती , वैयक्तिक , सामाजिक, राजकीय, आर्थिक किंवा अन्य भांडण झाले तरी पोलीस, वेगवेगळ्या वाहनाने कसेही, कुठेही अपघात झाले तरी पोलीस? , मतदान प्रक्रिया पोलीस, चोरी झाली पोलीस, मारामारी झाली पोलीस अशा विविध ठिकाणी पोलिसांना आपले कर्तव्य व्यक्तीपरत्वे बजावावे लागते. काहीवेळा स्वतःच्या कुटुंबांसाठीही वेळ देता येत नाही. म्हणून पोलिसांच्या विविध समस्या मार्गी लावण्यासाठी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य या संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांच्या मार्गदर्शनाखाली मा. मुख्यमंत्री व राज्याचे गृहमंत्री यांना मा. उपजिल्हाधिकारी कार्यालय देगलूर यांच्या मार्फत निवेदन देण्यात आलेले आहे.. याप्रसंगी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे देगलूर तालुका अध्यक्ष सुनील मदनूरे, तालुका संघटक मारोती देगावकर, मनोज बिरादार, तालुका उपाध्यक्ष चंद्रकांत गज्जलवार, तालुका सचिव संतोष मनधरणे, तालुका कोषाध्यक्ष ईश्वर देशमुख, देगलूर शहर अध्यक्ष उमाकांत कोकणे, अनिल पवार, दादाराव वेळीकर, मल्लिकार्जुन कडलवार, अमित पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते. संघाचे नांदेड जिल्हाध्यक्ष संजीवकुमार गायकवाड व जिल्हा संपर्क प्रमुख विशाल पवार यांच्या नेतृत्वाखाली देगलूर तालुका अध्यक्ष सुनील मदनुरे यांच्या पुढाकाराने महाराष्ट्रातील तमाम पोलीस बांधवांच्या अनेकविध मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले.त्यातील विविध मागण्यात पोलिसांना सुसज्ज, सुंदर कॉर्टर बनवून देणे, पोलिसांना टी. ए. वाढवून देणे, पोलिसांची ड्युटी आठ तास करणे, पोलीस कर्मचाऱ्यांना पगार वाढवून देणे, एखादा पोलिस कर्मचारी ड्युटीवर शहीद झाला तर त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत करणे व त्यांच्या वारसाला तात्काळ नोकरीत समाविष्ट करणे, पोलीस कर्मचाऱ्यांना २००५ पासून बंद झालेले पेन्शन पूर्ववत करणे, महाराष्ट्रातील पोलीस ठाणेमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या वाढवणे, पोलीस कर्मचाऱ्यांच्या मुलांना पोलीस नोकरी मध्ये पाच टक्के आरक्षण देणे , अशा विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.