पती पत्नीत झाला वांग्याच्या भाजी वरुन वाद, चिडलेल्या पतिने पत्नीला रॉकेल टाकून जाळल.
पती पत्नीत झाला वांग्याच्या भाजी वरुन वाद, चिडलेल्या पतिने पत्नीला रॉकेल टाकून जाळल.

पती पत्नीत झाला वांग्याच्या भाजी वरुन वाद, चिडलेल्या पतिने पत्नीला रॉकेल टाकून जाळल.

पती पत्नीत झाला वांग्याच्या भाजी वरुन वाद, चिडलेल्या पतिने पत्नीला रॉकेल टाकून जाळल.
पती पत्नीत झाला वांग्याच्या भाजी वरुन वाद, चिडलेल्या पतिने पत्नीला रॉकेल टाकून जाळल.

✒️लातूर जिल्हा प्रतिनिधी✒️
लातूर :- लातूर जिल्हातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. वांग्याच्या भाजीच्या वादातुन एका पतीने आपल्या पत्नीला रॉकेल ओतून जाळल्याची संतापजनक घटना लातूर जिल्ह्यातल्या हेर इथं घडली आहे. लातूरच्या उदगीर तालुक्यातील हजार-दीड हजार लोकसंख्येचं हेर हे गावं… या लहानश्या गावातील घटनेने संपूर्ण लातूर जिल्हा हादरला आहे. या घटनेमुळे सर्वीकडे संताप व्यक्त करण्यात येत आहे.

एक व्यसनी पती दारु पीऊन मद्यधुंद अवस्थेत घरी आलेल्या पतीने आपल्या पत्नीकडे जेवायला वांग्याची भाजी देण्याचा आग्रह केला. पत्नीने भाजी संपली आहे असं सांगताच पतीने रागाच्या भरात पत्नीच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिले. ज्यामध्ये पत्नी फर्जाना शेख ही गंभीररीत्या जखमी झाली आहे.

सकाळी फर्जाना हिने वांग्याची भाजी केली होती, मात्र शादूल वाद करून जेवण न करताच निघून गेला होता. रात्री येऊन त्याने वांग्याचीच भाजी देण्याचा आग्रह धरला. भाजी संपलीय असे सांगताच त्याने फर्जानावर रॉकेल ओतून पेटवून दिले. त्यात ती गंभीररित्या जखमी झाली आहे.

अतिशय गंभीर भाजलेल्या फर्जाना शेख यांच्यावर लातूरच्या सरकारी दवाखान्यात उपचार सुरु आहेत. पोलिसांनी आरोपी पती शादूल शेख याला अटक केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here