प्रयत्न केल्यास उत्तम कवींना गझल वश होऊ शकते, गडचिरोलीच्या गझल कार्यशाळेत मान्यवरांचे आशावादी मनोदय

कृष्णकुमार निकोडे
गडचिरोली: दि.१३ जून:स्थानिक झाडी बोली साहित्य मंडळाच्या वतीने नुकतीच गझल कार्यशाळा गोकुळनगरच्या शिवाजी कनिष्ठ विज्ञान विद्यालयात घेण्यात आली. या कार्यशाळेत गझल विधा हा प्रकार कठीण असला तरी सततच्या अभ्यासाने तिला वश करता येते. असे प्रतिपादन गझल कार्यशाळेला अध्यक्ष म्हणून लाभलेले दै.सकाळचे जिल्हा प्रतिनिधी मिलींद उमरे यांनी केले. कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक गझलकार दिलीप पाटील यांनी गझलेच्या तंत्राचे विविध पैलू उपस्थितांना वेगवेगळे उदाहरण देऊन उमगवतांनाच गझल गाऊन रसिकांना मंत्रमुग्ध केले. 

https://mediavartanews.com/2023/06/13/jitendra-awhad-about-mumbra-city/

तसेच दुसरे मार्गदर्शक लाभलेले गझलकार प्रशांत भंडारे यांनी गझलेचा पूर्वेइतिहास सांगून महाराष्ट्रात सुरेश भटांनी मराठी गझल ताकदीने उभी करुन तिला वैभवाच्या शिखरावर नेल्याचे विशद केले. त्यांनी गझल तंत्र शिकवताना सुरेश भटांच्याच गझलांच्या शेरातील ख्याल, रदीफ, कवाफि, अलामत, यती यांचा अनेक ठिकाणी संदर्भ दिला. स्वतःच्या गझलांची पण उदाहरणे दिली. हे शेर उपस्थितांसमोर गातांना किंवा फेकताना रसिक एवढे आंनदाने भावविभोर व्हायचे की, अनेक वेळा वाह.., मुकरर इत्यादी दादयुक्त बोल कवी रसिकांकडून सहज येत होते.

याच कार्यक्रमात खेमदेव हस्ते लिखीत आनंदी पुस्तकाचे प्रकाशन गझलकार मिलिंद उमरे यांच्या शुभहस्ते करण्यात येऊन त्यांचा मंडळाच्या वतीने शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर चंद्रपूर जिल्हा (ग्रामीण) झाडीबोली साहित्य मंडळाचे अध्यक्ष तथा साहित्यिक अरूण झगडकर, नाटककार चुडाराम बल्लारपुरे, कवी लक्ष्मण खोब्रागडे, कवी सुनील पोटे, ग्राफिक्स रामकृष्ण चनकापुरे यांची प्रमुख उपस्थिती होते.

https://mediavartanews.com/2023/06/10/eye-donation-information/

गडचिरोली सारख्या दुर्गम भागात साहित्य निर्मितीची आवड निर्माण व्हावी, नवीन साहित्यिक निर्माण व्हावे, त्यांना व्यासपीठ, मार्गदर्शन मिळावे यासाठी झाडीबोली साहित्य मंडळाचे नेहमी उपक्रम सुरू असतात. हे त्यांचे कार्य जिल्ह्यासाठी भुषणावह तसेच प्रसशंनीय आहे. असे गौरवोद्गार या प्रसंगी कार्यक्रमाध्यक्ष मिलींद उमरे यांनी काढले. या प्रसंगी कविसंमेलनही घेण्यात आले. त्यात जितेंद्र रायपुरे, मारोती आरेवार, मिलिंद खोब्रागडे, प्रगती चहांदे, अर्पणा नैताम, प्रतिक्षा कोडापे, मालती सेमले, आनंद बावणे, सुनील उराडे, डॉ.देवेन्द मुनघाटे, प्रकाश मशाखेत्री, उपेन्द्र रोहणकर, इत्यादी कवींनी विविध विषयांवर आशयघन रचना सादर केल्या.

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.चंद्रकांत लेनगुरे यांनी केले. सूत्रसंचालन कमलेश झाडे यांनी केले तर आभार संजीव बोरकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डाॅ.प्रवीण किलनाके, पुरूषोत्तम ठाकरे, वर्षा पडघन, प्रतिक्षा कोडापे, आदी मंडळाच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here