*युरियाचा तुटवडा तात्काळ भरून काढा*
मा.आ.धर्मराव बाबा आत्राम यांची मागणी
*वडसा रॅक पॉइंटवर युरियाची टंचाई*
टंचाई भरून न काढल्यास आंदोलनाचा दिले ईशारा

मा.आ.धर्मराव बाबा आत्राम यांची मागणी
*वडसा रॅक पॉइंटवर युरियाची टंचाई*
टंचाई भरून न काढल्यास आंदोलनाचा दिले ईशारा
मारोती कांबळे
गडचिरोली जिल्ह्या
ग्रामीण प्रतिनिधी
९४०५७२०५९३
– शेतीच्या हंगामाला सुरुवात झाले असून युरिया व रासायनिक खतांचा तुटवडा असल्याने तुटवडा तात्काळ भरून काढा, अन्यथा शेतकऱ्यांना सोबत घेऊन रस्त्यावर उतरणार असा ईशारा प्रसिद्धीपत्रकाद्वारे आ.धर्मराव बाबा आत्राम यांनी दिले आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात आ.धर्मराव बाबा आत्राम यांनी नमूद केले आहे की, गडचिरोली जिल्हा उद्योग विरहित जिल्हा असून शेती हाच प्रमुख व मुख्य व्यवसाय असल्याने जिल्ह्यातील ‘वडसा रॅक’ पॉइंटवर युरिया पाहिजे त्या प्रमाणात उतरवित नसल्याने जिल्ह्यात युरियाची मोठी टंचाई व तुटवडा होत आहे. त्यामुळे केंद्राचे कृषी तथा किसान कल्याण मंत्री ना. नरेंद्र सिंह तोमर यांनी गडचिरोली जिल्ह्यात युरियाचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध व्हावे यासाठी विशेष प्राधान्याने लक्ष देण्याकडेही आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी प्रसिद्धीपत्रकात लक्ष वेधले आहे.
प्रसिद्धी पत्रकात पुढे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी म्हटले आहे की, शेतकरी हा जगाचा पोशिंदा असून शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारे साहित्य सामुग्री वेळेवर उपलब्ध झाले तर , शेतात भरघोस पिके व उत्पादन घेता येते, दरवर्षी युरिया व रासायनिक खतांचा टंचाई भासत असते त्यामुळे शेतकऱ्यांना निराश व्हावे लागते, आता परिस्थिती बद्दलने काळाची गरज असून जगाच्या पोशिंदाला व बळीराजाला नैराश्याच्या खाईत न ढकलता युरिया व रासायनिक खतांचा तुटवडा होऊ देऊ नये व गडचिरोली जिल्ह्यातील वडसा रॅक पॉइंटवर अधिक प्रमाणात युरिया उतरविण्यात यावे, तसे न झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन छेडावे लागेल असा ईशारा आ.धर्मराव बाबा आत्राम यांनी पत्रकातून दिले आहे.