जागतिक मातृत्व दिवस: आई वटवृक्षाची सावली तर वडिल आयुष्याची ढाल

रमेश कृष्णराव लांजेवार 

मो.नं.९९२१६९०७७९

जगात मातृत्व ही वटवृक्षाच्या सावलीसारखी सतत आपल्या भोवताल कुठे ना कुठे वावरत असते.तर वडिल आयुष्याची ढाल बनून सतत मुलांची व संपूर्ण कुटुंबाचे रक्षण करण्यात तत्परतेने कार्य करीत असतो.याकरीता आई-वडील हे दोघेही उन, पाऊल,तहान-भुक विसरून कुटुंबाच्या जोपासनेस प्रथम प्राधान्य देत असतो.

मातृत्व दिवस हा पहिल्यांदा १९०८ ला युनायटेड स्टेट्स मधील ॲना जार्विस नावाच्या महिलेने तिच्या आईच्या सन्मानार्थ साजरा केला होता.याच माध्यमातून मातृत्व दिनाची सुरूवात अमेरिकेतुन १९१२ साली झाली.नंतर अमेरिकेचे अध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी मातृत्व दिनाबद्दल राष्ट्रीय सुट्टी जाहीर केली.यामागचा मुख्य उद्देश म्हणजे आपल्या आईसाठी एक तरी दिवस काढावा व तिला आनंदीत ठेवावे.मातृत्व दिवस जगभर साजरा करण्याची तारीख थोडी वेगळी दिसुन येते.परंतु जगातील बहुतेक देशांमध्ये मातृत्व दिवस हा मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारला साजरा केला जातो.त्यामुळे यावर्षी मातृत्व दिवस १४ मे रोज रविवारला साजरा केला जात आहे.

मानवी नातेसंबंध आणि जगातील वेगवेगळ्या नात्यातील एक नातं म्हणजे आईच नात.आई आणि मुलांचे नाते म्हणजे समुद्रातील पाण्यासारख अफाट असते.कारण प्रत्येक आई मुलांना घडवीते सुसंस्कृत करते पदोपदी मुलांची काळजी घेते यातच मातृत्व दडलेले दिसून येते.कारण आई मुलांच्या सानिध्यात चोवीस तास असते.त्यामुळे आपले मुल काय करीत आहे आणि आपण त्यांच्यासाठी काय केले पाहिजे याची सटीक चाहूल आईला कळते व त्यापध्दतीने मुलांचे संगोपन करीत असते.आई अशी दैवी शक्ती आहे की आकाश पाताळ एक करते परंतु मुलाला कधीच उपाशी ठेवत नाही.आई घरातील सर्वांचे जेवण झाल्यावरच जेवण करीत असते.

आई-वडीलांच नातं या भुतलावर अफाट असुन न भूतो न भविष्यती अशाप्रकारचे हे नाते आहे.कारण वडिल भुक-तहान विसरून आपल्या कुटुंबाकरीता राबत असतो व घरग्रहस्ती चालवीतो. म्हणजेच घराला आर्थिक बळ देण्याचे काम वडिल करीत असतात तर वडिलांनी केलेल्या कमाईच्या आधारे घर चालवण्याची मोठी जबाबदारी आईची असते.कारण मोजक्या पैशात आईला घर चालवायचे असते.म्हणजे घरात काय कमी जास्त आहे हे सर्व आईलाच पहावे लागते व ही तीची मोठी कसोटीची परिक्षा असते. समाजात आईच्या कार्याला तोड नाही व वडिलांच्या कर्तुत्वाला कोणीही मात करू शकत नाही.म्हणुन सर्वांनीच लक्षात ठेवले पाहिजे की आपले खरे गुरु व  दैवत आई-वडीलच त्यामुळे आजच्या तरुण पिढीने आई-वडीलांना प्रथम स्थानावर ठेवले पाहिजे.आई या शब्दाला किती महत्त्व आहे हे आपण या ओवी वरून समजू शकतो.

आई माझा गुरु,आई कल्पतरू सुखाचा सागर आई माझी,प्रीतीचे माहेर, शांतीचे आगर मांगल्याचे सारं आई माझी.म्हणजे आईविना जग नाही. आपल्याला थोडीशी जरी इजा किंवा दुर्घटना झाली तर मुलं आईग म्हणून किंचाळतो तेव्हा आईच्या रूपात कोणीना -कोणी अवश्य धावुन येतोच ही दैवी शक्ती आई या शब्दात आपल्याला दिसुन येते.या उलटं वडिलांचे आहे.एखादी मोठी दुर्घटना घडली तर प्रत्येक व्यक्ती बापरे म्हणून जोरांनी ओरडतो अशा वेळी ताबडतोब आजुबाजुला असलेले नागरिक वडिलांची भूमिका बजावतात.म्हणजेच वडील तीथेच नसतांना सुध्दा तेथील संपूर्ण नागरिक वडिलांची भूमिका बजावतात.अशा वेळी आपणही म्हणतो की लोक देवासारखे धावुन आले. म्हणजे आईग आणि बापरे या कठीण शब्दांसामोर सर्वसामान्य माणूस आपल्या आई-वडिलांची भुमिका बजावतात व दैवी रूपाने मदतीला धावून येतात. मानवजातीमध्येच ज्याप्रमाणे आईची भूमिका असते त्याचप्रमाणे संपूर्ण पशुपक्षी व जीवसृष्टीमध्ये आईची भूमिका अग्रगण्य असल्याचे आपल्याला दिसून येते.कारण मुलांच्या आयुष्यात नेहमीच ती सुर्याच्या प्रकाशाप्रमाणे वावरत असते जेणेकरून मुलांच्या आयुष्यात कुठेही अंधक्कार पडणार नाही याची काळजी घेत असते.कारण आई आपल्या मुलांसाठी आपल्या जीवाचा आटापिटा करून मुलाला लहाण्याचा मोठा करते.

त्यामुळे आज सर्वांचीच प्रथम जबाबदारी आहे की आपल्या आई-वडिलांची सेवा करने,पालनपोषण करणे, त्यांच्या प्रकृतीची काळजी घेणे व त्यांच्या वेदना जाणुन घेऊन त्यांवर उपाययोजना करणे आणि आई-वडीलांना सुखी व समाधानी ठेवणे यातच आपल्याला खरा जागतिक मातृत्व दिवस दीसुन येईल.माझ्यामते मातृत्व दिवस ठराविक दिवशीच का साजरा करावा.दररोज का साजरा का करू नये? मी तर म्हणेन की मातृत्व दिवस हा दररोज आई-वडीलांची सेवा करून साजरा केला पाहिजे व आपण ते दिवस आठवायला पाहिजे की आपल्याला लहाण्याचे मोठे करण्यासाठी आईने कीती यातना व दु:ख सहन केले असावे.याची जाणीव आज मुलांनी ठेवण्याची गरज आहे.कारण आईने आपल्याला वटवृक्षाच्या छायेत लहाण्याचे मोठे केले व याच वटवृक्षाचा पहारेकरी म्हणून वडिलांनी आपली चोख भुमिका बजावली.

आई-वडीलच्या तत्परतेमुळेच मुलांच्या केसालाही धक्का लागत नाही ही दैवी शक्तीच म्हणावी लागेल.मातृत्व दिनाच्या निमित्ताने मी सर्वांना हेच सांगु इच्छितो की आपण सर्वांनी भारतीय संस्कृतीच जपायला हवी यातुनच आपल्याला खऱ्या अर्थाने आईची सेवा करता येईल.पाश्चिमात्य देशात आई-वडील सोडून इतर नातेसंबंध अंकल व ॲटी या दोन शब्दात संपुष्टात आली आहे.परंतु भारतीय संस्कृतीत आजी, आजोबा,काका, काकु,मामा,मामी, आत्या इत्यादी अनेक  वेगवेगळे शब्द आपल्याला वेगवेगळ्या नात्यांप्रमाणे दिसून येतात त्यांचा सन्मान व्हायलाच पाहिजे.त्यामुळे अंकल-ॲन्टी हे पाश्चिमात्य शब्द  विसरायला हवे.त्याचबरोबल मम्मी-पप्पा या शब्दांना पुर्णविराम देऊन आई-बाबा असे शब्द ऐकू आले तर भारतीय संस्कृतीचा सन्मानच अवश्य होईल असे मला वाटते.

आपण १४ मे ला मातृत्व दिवस साजरा करीत असतांना पृथ्वी मातेचाही थोडासा विचार करायला हवा.कारण आज पृथ्वीची जोपासना होत नसल्याने निसर्ग दिवसेंदिवस कोपत आहे.याकरीता जागतिक मातृत्व दिनाचे औचित्य साधून प्रत्येक मुलांनी आजच्या दिवशी एकतरी वृक्ष लावले पाहिजे.यामुळे एकाच दिवशी देशासह संपूर्ण जगात लाखोंच्या संख्येने वृक्ष लागवड झाल्याचे आपल्याला दिसून येईल.यामुळे पृथ्वीचे संतुलन स्थिर रहाण्यास मोठी मदत होईल. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here