घाटी येथील तेंदूपत्ता मजूरावर रानटी हत्तीचा कळपाचा हल्ला,मजूरांची पळापळ,१ जखमी
चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी मनोज गोरे मो.9923358970
कोरपना :- घाटी वन कम्पार्टमेन्ट क्र २९७ येथे आज दि.१४ मे मंगळवार रोजी सकाळी ९.३० वाजचा तेंदूपत्ता संकलन करणार्या मजूरावर रानटी हत्तीचा कळपाने हल्ला चढवल्याने मोठी पळापळ झाली यावेळी एका मजूराने जिव वाचविण्याकरीता झाडावर आश्रय घेतला मात्र हत्तीनी हा झाडच मोडल्याने तो झाडासह जमीनीवर कोसळला मात्र या विपरीत परीस्थीतही त्याने आपला तोल ढळू न देता तिथून पळ काढल्याने त्याचा जिव बचावला.
तालूक्यातील घाटी येथे तेंदूपत्ता संकलना करीता गावातील जवळपास साळे तिनशे मजूरांचा जत्था आज पहाटेचा सूमारास नजीकचा जगंलात गेला होता यावेळी संकलनाचे काम सूरू असताना सकाळी ९.३० वाजेचा सूमारास किंचाळत रानटी हत्तीचा कळप त्यांचा दिशेने येत असल्याची कूणकूण मजूराना लागताच त्यानी तोडलेली पाने साहित्य तिथेच ठेवत पळ काढत आपला जिव वाचविला मात्र यावेळी घाटी येथीलच मजूर ईश्वर भोयर वय ५५ हा हत्तीचा वेढ्यात सापडला त्याने तिथे एका रोहणीचा झाडावर चढत जिव वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र हत्तीचा कळपाने तो झाडच मोडल्याने तो झाडासह जमीनीवर कोसळला मात्र त्याचे दैवबलवत्तर जखमी अवस्थेतही त्याने तिथून मोठ्या शिताफीने पळ काढला व आपला जिव वाचविला यावेळी पळापळ झाल्याने अनेक मजूरांचा दूचाक्या, सायकल व इतर साहित्य जगंलातच पळून आहे.जखमी भोयर यांचा दोन्ही हात व कमरेला गंभीर दूखापत झाली आहे त्याना येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनेची माहीती मीळताच गोठणगांवचे क्षेत्र साहायक उईके महिला वनरक्षक कळमकर व वनविभागाचा चमूने घाटी गावाकडे धाव घेतली यावेळी संतप्त मजूरानी वनकर्मचार्याना घेराव घालत रानटी हत्तीचा कळप गावाशेजारी पोहचला असल्याची सूचणा मजूराना देत तेंदूपत्ता संकलन बंद ठेवण्याचे आवाहन का करण्यात आले नाही असा संतप्त सवाल करीत त्याना धारेवर धरले या प्रकरणात वनविभागाचा पूर्णपणे बेजबाबदारपणा व दूर्लक्षपणा कारणीभूत आहे असा आरोप सूद्धा गावकर्याकडून करण्यात आला आहे
येथील पानफळी मागील आठवड्यात ५ दिवस सूरू होती मात्र त्यानंतर चार दिवस बंद राहत आज मंगळवार पासून ती पून्हा सूरू होणार असल्याने मजूर तेंदूपत्ता संकलनाकरीता जगंलात गेले होते मात्र रानटी हत्तीचा परीसरातील हालचालीबाबद वनविभागाने कोणतीही पूर्वसूचणा गावात न दिल्याने मोठी दूर्घटणा होण्याचा धोका निर्माण झाला होता मात्र सूदैवाने हे संकट टळले अशी माहिती घाटी येथील उपसरपंच फाल्गुन फूले व पोलीस पाटील सूरेश टेकाम यानी दिली आहे.