अलिबागमध्ये जागतिक आपत्ती दिन साजरा!
अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:- मेरा युवा भारत युवा कार्यक्रम एवं खेल मंत्रालय, भारत सरकार, रायगड अलिबाग, प्रिझम सामाजिक विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने व रायगडचा युवक फाउंडेशन, स्पर्धा विश्व अकॅडमी, अलिबाग यांच्या सहकार्याने स्पर्धा विश्व अकॅडमी अलिबाग या ठिकाणी मेरा युवा भारतचे युवा अधिकारी अमित पुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक आपत्ती दिन साजरा करण्यात आला.
आपल्या गावात,रस्त्यावर कोणतीही आपत्ती आल्यास त्या साठी त्वरित मदत करणे आणि त्याचे जीवन वाचविणे ही देशसेवाच आहे म्हणूनच पोलीस दलात दाखल होऊन देशसेवा आपण निश्चित पणे कराल याची मला खात्री वाटते असे मार्गदर्शन आपत्तीव्यवस्थापन तज्ञ व प्रमुख मार्गदर्शक प्रा.डॉ.जयपाल पाटील यांनी केले. यावेळेस व्यासपीठावर प्रा.डॉ. जयपाल पाटील ,प्रा. श्याम जोगळेकर , प्रिझम संस्थेच्या अध्यक्षा राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी, भारत सरकार तपस्वी गोंधळी, स्पर्धा विश्व अकॅडमीच्या संचालिका सुचिता साळवी उपस्थित होते. प्रास्ताविकात तपस्वी गोंधळी म्हणाल्या आपत्ती कधी, केव्हा येईल हे सांगता येत नाही. या साठी जागतिक कितीॅचे आपत्तीव्यवस्थापन तज्ञ प्रा.डॉ जयपाल पाटील यांना मार्गदर्शनासाठी मेरा युवा भारत,खेल मंत्रालय केंद्राकडून जिल्हा युवा अधिकारी श्री.अमित पुंडे यांनी आपल्याकडे पाठविले आहे,पाटील सरांचे मार्गदर्शन मी 2016ला घेतले आहे ते सांगतात ती माहीती तुम्हाला उपयुक्त ठरेल. यानंतर संविधान वाचन करून वीजेबाबत “दामिनी” अँप, वाहन परवाना स्वतःजवळ नसेल तर या बाबत शिक्षा व दंडाची माहीती दिली. शेतकऱ्याचा दुर्दैवी वीज पडुन मृत्यु झाल्यास स्व. गोपीनाथ मुंडे वीमा रुपये 2 लाख कुटुंबाला दिले जातात याची माहीती,मुला-मुली,महिला सुरक्षित साठी महाराष्ट्र पोलीस 112क्रमांक चा वापर, साप-विंचु दंश वेळेत व अपघात प्रसंगात 108 रुग्णवाहिकेचा वापर याचे प्रात्यक्षिक देताना108चे रायगड उप प्रमुख श्री.अजय जगताप यांना मोबाईल करताच डॉ.जयप्रकाश पांडे व पायलट श्री.सुशांत पाटील हजर झाले.त्याचे स्वागत तपस्वी गोंधळी यांनी केले,जेष्ठ किंवा बाळंतपणासाठी जाणाऱ्या महिलेस हाताच्या घडीवर रुग्णवाहिके पर्यंत कसे न्यायचे याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.यावेळेस प्रा. श्याम जोगळेकर यांनी खास करून मुलींवर होणारे अत्याचार बाबत काळजी कशी घेता येईल व तुम्ही पोलीस दलात भरती होणार असून नोकरी करताना ती प्रामाणिकपणे करा कोणत्याही प्रलोभनास बळी पडू नका व रायगड नाव उज्वल करा असे आवाहन केले.शेवटी प्रा.डॉ.जयपाल पाटील यांनी आपली लाडू ही कविता ऐकविली सदर कार्यक्रमाचे आभार संचालिका सुचिता साळवी यांनी मानले.









