आपण खरंच स्वतंत्र आहोत???

68

स्वातंत्र्य दिन: कंटेनरच्या अलीकडचा

आपण खरंच स्वतंत्र आहोत???

प्रशांत जगताप: आज भारत स्वतंत्र झाला वाचायला अन ऐकायला सुद्धा बरं वाटत नाही, देशाला स्वातंत्र्य प्राप्तीसाठी बलिदान करण्या-या लोकांनी पाहलेल्या स्वप्नाची खरच फळपूर्ती होत आहे काय??

हाताला काम नाही म्हणून दारूचे अड्डे मटक्याचे अड्डे, गांजा, चरस, बंद पाकिटात चोरून गुटखा आणणारे लोक पाहिले अनेक अवैध धंदे चालवणारे मुलं पाहिले,गरिबी लाचारी मुळे वेश्याव्यवसाय करणाऱ्या मुली पाहिल्या, हाताला काम नाही, पिकवलेल्या मालाला भाव नाही म्हणून अनेक तरुण बेरोजगार शेतकरी नैराश्यातून आत्महत्त्या करणारे पाहिले, बसस्टँड, रेल्वेस्थानक, फुटपाथवर भीक मागणारे अनेक पाच वर्षापेक्षा कमी मुले पाहिले, अंध अपंग, मेंटल वेडे सायको लोक एकवेळच्या अन्नासाठी भटकंती करताना पाहिले.

लाल किल्ला, दिल्ली  – १५ ऑगस्ट रोजी 

पोटच्या पोरीच्या लग्नाला शिक्षणाला पैसा नाही म्हणून स्वतःच्या मुलीला विकणारे मायबाप पाहिले, जाती धर्मावरून एकमेकांचे मुडदे पडणारे तरुण पाहिले, तांड्या वस्तीवर दलित आदिवासी भागात लाईट पाणी शिक्षण आरोग्य यापासून वंचित राहिलेले लोक पाहिले,अन्नावाचून कुपोषित राहिलेले अनेक मुलं पाहिले,
गावात बस नाही म्हणून शिक्षणासाठी पाच किलोमीटर पायी चालणारे विद्यार्थी पाहिले, शाळेच्या पाससाठी, हुंडा देण्यासाठी, पैसे नाहीत म्हणून अनेक मुलींनी आत्महत्त्या केलेल पाहिलं.दिवसाढवळ्या पाच वर्षांपासून ते 80 वर्षाच्या म्हातारीपर्यंत मुलींच्या अब्रू लुटताना पहिली, हुंड्यासाठी स्त्रियांचा मानसिक कौटुंबीक छळ करताना तिला जाळून मारताना पाहिले.

सामाजिक – राजकीय – शैक्षणिक – आर्थिक – आरोग्य क्षेत्रामधील भारताचे जागतिक देशांमधील स्थान भारताचे स्थान एकूण देश

  भारताचे स्थान एकूण देश
जागतिक सर्वात जास्त  शांततापूर्वक देश 135 163
जागतिक सर्वात जास्त प्रेस स्वातंत्र्य असलेले देश 142 180
नागरिकांची आर्थिक स्वत्रंतता 121 184
जगातील भ्रष्टाचारी देश 86 180
जगातील सर्वात जास्त आनंदी देश 139 149
जागतिक कुपोषण निर्देशांकात 94 107
सामाजिक प्रगती करणारे देश 117 128
युवा विकास 122 181

स्वतःच्या हक्क स्वातंत्र्य समानतेसाठी न्यायासाठी आवाज उठवला म्हणून कधी देशद्रोही, तर कधी आतंकवादी नक्षली म्हणून तुरुंगात सडताना पाहिले, दवाखाण्याचा खर्च भरायला पैसे नाहीत म्हणून दवाखाण्याच्या बाहेर तडफडत तडफडत मेलेल्या लोकांना पाहिलं, पोटाची खळगी भरण्यासाठी, हजारो कोलिमिटरचा प्रवास करून अनेक राज्यात गेलेल्या तरुणांकडून 12/12 तास काम करून घेणारे भांडवलदार पाहिले, कोणी आंबेडकरांचे गाणे वाजवले तर कधीच चौकातून मिरवणूक काढली म्हणून त्याची हत्त्या करणारे लोक पाहिले.

इतक भयावया गोष्टी बघीतल्या, मग मी कसा म्हणू माझा भारत देश महान आहे, स्वतंत्र आहे, मला हे स्वातंत्र्य मान्य नाही म्हणूनच 16 ऑगस्ट 1947 ला अन्नाभाऊ साठे म्हणायचे देश की जनता भुखी है ये आझादी झुठी है.जय भारत.