ग्रामपंचायत निवडणुकीत मनसेचं इंजिन धावलंच नाही.

आज सकाळी मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर पाच ग्रामपंचायतींमध्ये मनसे आघाडीवर होती. मात्र, तेव्हापासून मनसेचे इंजिन पुढे सरकरलेलेच नाही.

मुंबई:- ग्रामपंचायतीच्या निवडणुका ताकदीने लढवण्याचा निर्धार केलेल्या राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला  निकालात मात्र फारसे यश मिळताना दिसत नाही. आज सकाळी मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर पाच ग्रामपंचायतींमध्ये मनसे आघाडीवर होती. मात्र, तेव्हापासून मनसेचे इंजिन पुढे सरकरलेलेच नाही. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुका ताकदीने लढवण्याचा मनसेचा निर्धार फुसका बार ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

यापूर्वी राज्यातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही मनसेचे पानिपत झाले होते. तेव्हापासून मनसे सुस्तावलेली होती. मात्र, पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीपासून राज ठाकरे पुन्हा एकदा सक्रिय झाले होते. मात्र, त्या निवडणुकीतही मनसेचा फारसे यश मिळाले नव्हते. त्यानंतर आता ग्रामपंचायत निवडणुकीतही मनसेची पाटी कोरीच राहण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here