औष्णिक विद्युत केंद्रातून वारंवार जल प्रदूषणाला चालना – राजेश बेले
अश्विन गोडबोले
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
मो: 8830857351
चंद्रपूर,18 ऑगस्ट: मागील आठवड्यात थर्मल पावर स्टेशनच्या दूषित पाण्यामुळे चंद्रपूर शहरातील पाणीपुरवठा जल प्रदूषणामुळे खंडित करण्यात आला होता. यामुळे शहरातील नागरिकांना तब्बल चार दिवस पाण्यापासून वंचित राहावे लागले होते. अश्याच घटनेची पुनरावृत्ती पुन्हा गुरुवारी 17 ऑगस्ट रोजी झाली.
चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रातून रानवेंडली नाल्यावरून सी. एस. टी. पी. एस. परिसरातील वाहणाऱ्या नदीत पात्रात दूषित पाणी सोडण्यात आले. हे पाणी लाल रंग मिश्रित द्रव्य आणि कोळसा मिश्रीत प्रदूषित पाणी एकत्रित रानवेंडली नाल्यातून सोडले जात असल्याचे महाराष्ट्र प्रदूषण विभागाचे अधिकारी तानाजी यादव यांच्यासह संजीवनी पर्यावरण संस्थेचे अध्यक्ष राजेश बेले यांच्या निदर्शनास आले. यावेळी पाण्याचे नमुने तपासण्यासाठी घेतले असून हे गढूळ पाणी असल्याचे आणि त्या पाण्याचे एन एस जी नॉर्मल असले तरी पी एस सी केल्यास नंतर प्रदूषणाची मात्रा किती व त्यात नेमके कोणते द्रव सोडल्या गेले आहे याची तपासणी झाल्यावर पुढील कारवाई करण्यात येईल अशी माहिती प्रदूषण अधिकारी तानाजी जाधव यांनी दिली.
जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची राजेश बेले यांची मागणी
मात्र शहराची जीवनवाहिनी असलेल्या इरई नदीत वारंवार प्रदूषित पाणी सोडल्याने येथील वन्यप्राणी, जलजिवन, पशुपक्षी, आणि मानवी जीवनावर याचा विपरीत परिमाण होत असल्याचे दिसून येत आहे. या संदर्भाची माहिती जिल्हाधिकारी, जिल्ह्याचे पालकमंत्री यांना असतानाही कुठलीही योग्य कारवाई होत नसल्याची खंत राजेश बिले यांनी यावेळी बोलून दाखवली. संबंधित विभागावर दोन लाखाची गॅरंटी तेवढी जप्त करण्यात आली. यावेळी केवळ थातूरमातून कारवाई करून प्रकरण दाबण्याचे प्रयत्न प्रदूषण विभाग करीत असल्याचा आरोप राजेश बेले यांनी केला आहे. संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई न केल्यास संजीवनी पर्यावरण संस्थेच्या माध्यमातून मोठे जन आंदोलन छेडण्याचा इशारा राजेश बेले यांनी दिला आहे.