लग्नाच्या वऱ्हाडाला घेरला काळाने , अपघातात सहा जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू

57
लग्नाच्या वऱ्हाडाला घेरला काळाने , अपघातात सहा जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू

लग्नाच्या वऱ्हाडाला घेरला काळाने , अपघातात सहा जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू

लग्नाच्या वऱ्हाडाला घेरला काळाने , अपघातात सहा जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू

✍️ भवन लिल्हारे जिल्हा प्रतिनिधी भंडारा📱 मो.नं.9373472847📞

नागपूर : दिनांक १५ डिसेंबर २०२३ रोजी नागपूर जिल्ह्यातील काटोलमध्ये क्वॉलीस आणि ट्रकचा आमोरा सामोर टक्कर झाल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे.
काल (शुक्रवारी) मध्यरात्री काटोल तालुक्यातील सोनखांब आणि ताराबोडी दरम्यान ही घटना घडली.
क्वालीस गाडी नागपूरवरून काटोलच्या दिशेनं जात असताना ट्रकनं गाडीला जोरदार धडक दिली. आणि भीषण अपघात झाला. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. नागपुरात एका लग्नाचा कार्यक्रम आटपून हे सर्वजण काटोलच्या दिशेनं जात होते. त्यावेळी भीषण अपघात झाला. जखमीला नागपुरातील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. तत्पश्चात
अपघातातील मृतांची नावे
अजय दशरथ चिखले (वय ४५) वर्षे , विठ्ठल दिगंबर थोटे (वय ४५) वर्षे ,सुधाकर रामचंद्र मानकर (वय ४२) वर्षे रमेश ओंकार हेलोंडे (वय ४८) वर्षे मयूर मोरेश्वर इंगळे (वय २६) वर्षे
वैभव साहेबराव चिखले (वय ३२) वर्षे, असे असून मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. एका क्वॉलीस कारमधून सात जण नागपूरहून काटोलच्या दिशेनं प्रवास करत होते. नागपुरात एका लग्नात हे सातही जण उपस्थित राहण्यासाठी आले होते. रात्री उशीरा नागपुरातील लग्नाचा कार्यक्रम आटपून सातहीजण आपल्या घरी निघाले होते. पण रस्त्यातच त्यांच्यावर काळानं घाला घातला. नागपूरहून काटोलच्या दिशेनं जात असताना समोरून येणाऱ्या एका ट्रकनं क्वॉलीस गाडीला धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की , क्वॉलीस गाडी ही दोन पलटी मारून उलटली , त्यात बसून असलेले लग्नातील वराडींचा चेंदामेंदा झाला.
ट्रकने क्वॉलीस गाडीला जोरदार धडक दिल्यानं भीषण अपघात झाला. अपघातात क्वॉलीस गाडीतील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. नागपुरातील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात ट्रॉमा सेंटरमध्ये जखमीवर उपचार सुरू आहेत. ट्रकची धडक एवढी जोरदार होती की, या अपघातात क्वॉलीस गाडीचा चकनाचूर झाला आहे.
अपघाताची माहिती मिळताच तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आणि बचावकार्य मोहीमेला सुरूवात केली. काही स्थानिकांनीही घटनास्थळी धाव घेत बचाव कार्यात मदत केली. क्वॉलीस गाडीतील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला होता. त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. आणि त्यांची ओळख पटवून त्यांच्या कुटुंबीयांना अपघाता संदर्भात माहिती देण्यात आली. तर अपघातात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तिला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर सध्या नागपुरातील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात ट्रॉमा सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. पूढील तपास सुरु आहे.