वीणा मास्कने अनेक आजारांना द्यावे लागत आहे निमंत्रण, मास्कचा वापर करून साथींचा फैलाव टाळावा.
✒साहिल महाजन यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी ✒
यवतमाळ,दि.19 मार्च:- कोविडसारख्या साथीच्या आजाराचा फैलाव थांबवण्यासाठी नियमित मास्क वापरावे. योग्य सामाजिक अंतर ठेवणे आणि वारंवार हात धुणे या त्रिसूचीचा अवलंब करावा मास्कचा नियमित वापर केल्याने कोव्हिडचाच नव्हे तर अशा सुमारे 80 ते 90% आजारांनवर नियंत्रण येऊ शकते. नियमित मास्कचा वापर केल्यामुळे बाधित रुग्णामार्फत प्रादुर्भाव होणाऱ्या कोविड 19 या साथीच्या आजारांवर नियंत्रण आले आहे. त्यामुळे वेगाने पसारणाऱ्या आजारापासून अनेकांचा बचाव झाला आहे. मास्क नसल्यास कोरोनाच नव्हे तर स्वाईन फ्लू तसेच विषाणूचा व्हायरस ताप, क्षय आदी आजारांचाही धोका संभवतो. याशिवाय प्लेग, निमोनिया असे अनेक आजारांपासून त्यावर नियंत्रण येत नसल्याचे सांगितले जातात. त्यामुळे नियमित मास्क वापरून साथींच्या आजारांचा फैलाव टाळा. मास्क मुळे अनेक आजारान वर नियंत्रण आले आहे. यात फुफुसाचा क्षय, निमोनिया अशा आजारांवर नियंत्रण आले.
विष्णूजन्य आजार मास्क न लावल्यामुळे धुळीतून पसरणारे आजार श्वसनाद्यारे होणारे आजार, स्वाईन फ्लू, क्षय, सर्दी, खोकला झालेल्या रूग्णांच्या संपर्कात आल्याने होणाऱ्या कोरोनासह इतर आजार पसरण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळेच परदेशातून येणाऱ्या स्ट्रेन्स कोरोना पासून बचाव करण्यासाठी मास्कचा आवर्जून वापर करावा.