अखेर शेतकऱ्यांसमोर झुकले मोदी सरकार, तिन्ही वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा.
✒ प्रशांत जगताप ✒
कार्य संपादक मिडिया वार्ता न्युज
📲 9766445348 📲
नवी दिल्ली,दि.19 नोव्हे:- माघील अनेक महिन्यापासुन सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचा आज विजय झाला आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलना पुढे अखेर मोदी सरकारला झुकाव लागल आहे. त्यानी आणलेले तीन कृषी कायदे परत घेण्याची घोषणा आज केली आणि देशातील जनतेची माफी माघीतली. पण शेतकरी आत्महत्या आणि नरसहार यांच्या प्रश्न तसाच राहिल?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रकाश पर्व सोहळ्याचं निमित्त साधून नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना मोठा दिलासा देताना तिन्ही वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली आहे. कायद्याच्या ज्या तरतूदीवर त्यांचा अक्षेप होता. तो बदलायला आम्ही तयार होतो. आम्ही दोन वर्षासाठी कायदे सस्पेंड करण्याचाही निर्णय घेतला. मी देशाची क्षमा मागून पवित्र मनाने हे सांगतो की आमच्या तपस्येत काही कमी पडली असेल. आम्ही काही सत्य काही शेतकऱ्यांना समजावू शकलो नाही. आज प्रकाशपर्व आहे. यावेळी कोणालाही दोष देण्याची ही वेळ नाही. आम्ही तीन कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. या महिन्याच्या अखेरीस संसदेच्या अधिवेशनात ही कायदे रिपील करण्याची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत, असं सांगतानाच शेतकऱ्यांनी आता आंदोलन करू नये. त्यांनी आपआपल्या घरी जावं. शेतावर काम करावं, असं आवाहन मोदींनी केलं.
आगामी निवडणुक डोळ्यासमोर ठेऊन हा निर्णय घेत असल्याचे जानवत आहे. कारण शेतकरी मागे हटायला तयार नाही. त्यामूळे उत्तर प्रदेशातील महत्वपुर्ण विधानसभा निवडणूकित भारतिय जनता पक्षाचे पाणीपत होणार नाही याच भितीतून हा निर्णय घेण्यात आला आहे. असे राजकिय गोत्यात चर्चा आहे.