हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयाला जिल्हा रुग्णालयाचा दर्जा त्वरित मिळावा: अतुल वांदीले, मनसे जिल्हाध्यक्ष.
हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयाला जिल्हा रुग्णालयाचा दर्जा त्वरित मिळावा: अतुल वांदीले, मनसे जिल्हाध्यक्ष.

हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयाला जिल्हा रुग्णालयाचा दर्जा त्वरित मिळावा: अतुल वांदीले, मनसे जिल्हाध्यक्ष.

हिंगणघाट उपजिल्हा रूग्णालयाला जिल्हा रूग्णालयाचा दर्जा त्वरीत देण्यात यावा जेणेकरुन हिंगणघाटला बेडची उपलब्धता वाढेल, तज्ञ डॉक्टरची संख्या वाढेल, औषधाच्या साठा जास्त प्रमाणात मिळेल, उपचारासाठी लागणारे साधने वाढतील मनुष्यबळ वाढेल त्यामुळे रूग्णाची हेळसांड हाेणार नाही व इथेच उपचार मिळेल. अतुल वांदीले मनसे जिल्हाध्यक्ष.

हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयाला जिल्हा रुग्णालयाचा दर्जा त्वरित मिळावा: अतुल वांदीले, मनसे जिल्हाध्यक्ष.
हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयाला जिल्हा रुग्णालयाचा दर्जा त्वरित मिळावा: अतुल वांदीले, मनसे जिल्हाध्यक्ष.

मुकेश चौधरी प्रतीनिधी✒
हिंगणघाट:- उपजिल्हा रुग्णालयाला जिल्हा रूग्णालयाचा दर्जा मिळावा कारण उपजिल्हा रूग्णालय हिंगणघाट येथे कोरोनाबाधीत रूग्णसंख्या वाढत आहे. इथे जर जिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळाला तर यात बेडची क्षमता वाढवून 150 किंवा 200 जर बेड वाढले, तर नियमाने बिल्डिंग, अतिरिक्त एम. डी.एम.एस तज्ञ डॉक्टर, सर्जन, आय.सी.यु. वॉर्ड, अनुभवी स्टाफ, उपचाराचे आधुनिक उपकरणे, साधन साम्रगी, मनुष्यबळ आदी बाबी वाढतील कारण सध्या इथे योग्य उपचाराअभावी रुग्णांना वर्धा, नागपूर येथे उपचारासाठी रेफर केले जाते. रुग्णाची परिस्थिती बघून वर्धा, नागपूरला रेफर करणे गरजेचे असते कारण उपचाराकरता इथे तज्ञ डॉक्टरांची उपलब्धी नाही स्त्री रोग तज्ञ, हृदयरोग तज्ञ, रेडिओलॉजिस्ट, सर्जन, त्यांच्या उपस्थितीत जो इलाज होतो तो हिंगणघाटला होत नसल्याने रुग्णांना दुसरीकडे हलविल्या जाते.

हिंगणघाट शहर जिल्हातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले व गजबजलेले शहर असून चारही बाजूंनी ग्रामीण भागातून तसेच दुरदुरून लोक मोठ्या संख्येने चांगले रस्ते व इतर दळनवळनाची सोय उपलब्ध असल्याने उपचार करण्यासाठी हिंगणघाट ला येत असते.हिंगणघाट ची कृषि उत्पन बाजार समिती विदर्भातील एक नंबर ची बाजारपेठ असल्याने दररोज हजाराच्या संख्येने शेतकरी येत असतात त्यामुळे उपजिल्हा रुग्णालयातील संसाधन,मनुष्यबळ व उपचारासंबधी साधनसामुग्री अपुरे पडत आहे. उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट येथे 100 बेड असून कोरोना बाधितांच्या उपचारार्थ ४५ बेड ची व्यवस्था करण्यात आली असून ज्या कोरोना बाधितांचे ऑक्सिजन लेवल कमी आहे व त्यांना व्हेंटिलेटरची आवश्यकता आहे. या सोयी इथे उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांची हेळसांड होत आहे. तसेच कोरोना बाधितांना आवश्यक त्या सेवा घेता येत नाही नसल्यामुळे पेशंटला वर्धा, नागपूर येथील सरकारी व खाजगी दवाखान्यात हलविण्यात येत आहे तेथेही बेड उपलब्ध नाही. त्यामुळे कोरोना बाधितांना उपचारासाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे.

शिवाय इथे दोन अर्बन प्राथमिक केंद्र सुद्धा आहे एक टाका ग्राउंड व एक शुक्रवार बाजार भरतो तिथे पण दोन्ही ठिकाणी डॉक्टर नाही व एकाच डॉक्टर कडे चार्ज आहे. पुरेसे मनुष्यबळ नसल्याने सुविधा असूनही अनेकांना जीवघेण्याप्रसंगाना सामोरे जावे लागत आहे. तरी उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट येथे कोरोना बाधितांच्या उपचारासाठी जिल्हा रुग्णालयाचा दर्जा त्वरीत मिळावा अशी मागणी मनसे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार  रामदासजी तडस व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना केली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here