ग्रामस्थांचा अवैद्य दारू विक्रीत्या विरोधात एल्गार

60
ग्रामस्थांचा अवैद्य दारू विक्रीत्या विरोधात एल्गार

ग्रामस्थांचा अवैद्य दारू विक्रीत्या विरोधात एल्गार

ग्रामस्थांचा अवैद्य दारू विक्रीत्या विरोधात एल्गार

✍️मनोज गोरे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी मो.9923358970

कोरपना :- कोरपनापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या धोपटाळाच्या पारधीगुड्यात मागील काही महिन्यांपासून काही दारूविक्रेते अवैधपणे दारू विकत आहे. या दारूविक्रीविरोधात स्थानिक पोलिस पाटील, कोरपना पोलिसांकडे अनेकदा तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र, कोणतीही कारवाई होत नाही. त्यामुळे स्थानिक नागरिक चांगलेच संतप्त झाले असून, गावातील अवैध दारूविक्रेत्यांविरोधात ग्रामस्थांनी एल्गार पुकारला आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी तत्काळ दखल घेऊन दारू बंद करण्याची मागणी स्थानिकांनी चंद्रपुरात आयोजित पत्रकार परिषदेत केली.गावातील अवैध दारूविक्रीमुळे या पारधीगुड्यातील शांतता आणि सुव्यवस्था धोक्यात आली आहे. अनेक शालेय विद्यार्थी दारूच्या आहारी गेले आहेत. वारंवार
दारूविक्रेत्यांना दारूविक्री बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, दारूविक्रेते अरेरावी करतात. जिवे मारण्याची धमकी देतात. शुक्रवारी एका
महिलेची दारू काही युवकांनी पकडली. पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी थातूरमातूर कारवाई करून महिलेची सुटका केली. यानंतर युवकांनी पकडलेली दारूच ती महिला विकत होती. त्यामुळे कोरपना पोलिसांची भूमिका संशय निर्माण करणारी असल्याचा आरोप पत्रकार परिषदेत पारधीगुड्यातील नागरिकांनी केला. दारूविक्रेत्यांवर कारवाईसाठी पोलिसांकडून होणारे दुर्लक्ष, दारूविक्रेत्यांची गुंडगिरी यामुळे नागरिक आता चांगलेच त्रस्त झाले आहे. पोलिसांनी स्थानिकांच्या मागणीची दखल घेऊन वेळीच दारूविक्रेत्यांवर कठोर कारवाई केली नाही. तर मोठे आंदोलन करू, असा इशारा यावेळी देण्यात आहे.
——————–
पारधी गुडा येथील महिला पुरुष यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन त्यांना गावातील आपबिती सांगितली त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी त्यांच्या निवेदनाची दखल घेऊन तात्काळ संबंधित कोरपणा पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप एकाडे यांच्याशी संपर्क करून त्यांना त्या गावातील अवैद्य दारू विक्री तात्काळ बंद करण्या संबंधित माहिती दिली दारू विक्री करणारेच थेट जिल्हा अधीक्षक यांना फोन करून तक्रार घेत नसल्याचे ठाण्यात तक्रार करतात व खोटी तक्रार दाखल करून गुन्हे दाखल करतात अशांवर कारवाई काम करू नयेत असा सवाल समस्त नागरिकांनी यावेळी केला
———————
अवैद्य दारू विक्रीमुळे गावातील शांतता सुव्यवस्था भंग पावत आहेत तसेच गावातील शेतकरी मुले महिला दारूच्या आहारी जात असल्याने हे अवैद्य दारू विक्री तात्काळ बंद करण्यात यावे महिला सुद्धा दारू विक्री करीत आहे.