भात कापणीच्या वेळेस पावसाचे थैमान हातातोंडांशी आलेला घास जमीनदोस्त होण्याची भीती; शेतकरी वर्गात मोठे चिंतेचे वातावरण

21

भात कापणीच्या वेळेस पावसाचे थैमान

हातातोंडांशी आलेला घास जमीनदोस्त होण्याची भीती; शेतकरी वर्गात मोठे चिंतेचे वातावरण

भात कापणीच्या वेळेस पावसाचे थैमान

हातातोंडांशी आलेला घास जमीनदोस्त होण्याची भीती; शेतकरी वर्गात मोठे चिंतेचे वातावरण

अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्युरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग: दिवसा प्रखर उष्णता आणि सायंकाळी पावसाचे आगमन यामुळे बळीराजा पुरता हैराण झाला आहे. भात शेतीच्या लोंब्यांचा दाणा तयार झाला असून, काही ठिकाणी भात कापणी सुरु केली आहे. कारण उन्हाच्या तिव्रतेने लोंब्यातून दाणा अलग होत असून, कापणी केली नाहीतर हाताला दाणा मिळणार नाही. याच विचारांतून भात कापणी सुरु केली आहे. दिवाळी सण आधी बहुतांशी ठिकाणी भात कापणी सुरुवात झाली आहे. मात्र, आता परतीच्या पावसाने बळीराजांस मोठ्या संकटात सापडलेले आहे. भात कापणी करावी की नाही हेच विचार त्यांस स्वस्त बसू देत नाही. त्यास बरोबर दुपारी रणरणत्या उन्हाची दाहकता वाढली असून, भात कापणींस मजूर मिळणे कठीण झाले आहे.ऐन दिवाळीच्या तोंडावर परतीच्या पावसाच्या धारा धो-धो कोसळल्या सोसाट्याच्या वारा आणि विजांचा कडकडाट त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पिकलेले भाताची नासाडी झाली आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर आणि भात कापणीच्या वेळेवरच पाऊस झाल्याने खूप मोठ्या प्रमाणावर बळीराजाचे नुकसान झाले आहे.बळीराजाचा नातं हे थेट शेतातील भाताच्या पिकांमध्ये आहे. त्याच्या कुटुंबीयांची मुलाबाळांची आनंदाची दिवाळी ही शेतात जात आहे.पावसाच्या भीतीपोटी उरले सुरलेले भात पावसाची विश्रांती मिळताच पदरात पाडून घेण्यासाठी मेहनतीने प्रयत्न करत असताना दिसून येत आहे.परतीच्या पावसामुळे दाणेदार कणस मोत्यासारखे धान जमीनदोस्त झाल्याने हातातोंडांशी आलेला घास निसर्गाच्या कोपामुळे हिरावून जाण्याच्या मार्गावर असल्यामुळे शेतकरी वर्गात मोठे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे, तर युवा पिढीचा शेती करण्यासाठी प्रयत्न यावर येत असलेल्या संकट यानेच खचून गेला आहे. बळीराजाची दिवाळी पुन्हा एकदा शेतातच सुरू झाली असून, परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. विशेषतः रायगड आणि कोकणासह अनेक भागांत विखुरलेल्या परतीच्या पावसाने कापणीसाठी तयार ठेवलेले धान भिजून चिखलात बसले आहे. त्यामुळे बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेण्याची शक्यता नाही तर एकूणच हिरात गेला आहे. पाऊस नेमक्याच दिवाळीच्या तोंडावर वादळ वाऱ्यासह पडला. त्यामुळे शेतातील पीक पूर्णतः झोपले तर काहीनी कापणी केलेले आणि ठेवलेले भाताचे भारे पुन्हा भिजले, पाणी साचल्याने पिक घटण्याची शक्यता आहे.
ओला दुष्काळ जाहीर केल्यामुळे यावर्षी मे महिन्यापासूनच पाऊस सुरू झाला त्यामुळे उन्हाळी पिके देखील त्या मोसमी पावसाने नासवली तरी देखील ताट मानेने पुन्हा खरपाच्या लागवडीसाठी सज्ज होऊन नव्याने लागवड केली त्यावर देखील अनेक प्रकारचे संकट आले आणि त्यातून उरलेसुरले पीक यावर आता परतीच्या पावसाची कुराड असल्याने अक्षरशः शेतकरी राजा चिंतेत सापडला आहे.