गुढीपाडवा शेतकरी संकल्पनाचा 

50

गुढीपाडवा शेतकरी संकल्पनाचा 

अभिजीत ध. बेहते (कृषी अभियंता)

मो: 8669187867

सर्वप्रथम आपनास व आपल्या परिवारास ग्रामगीता शेतकरी उत्पादक कंपनी चिमूर तर्फे गुढीपाडवा च्या मंगलमय हार्दिक शुभेच्छा चैत्र शुद्ध प्रतिपदा शालिवाहन शके या हिन्दू नविन वर्ष सुरू झाले

म्हणजे गुढीपाडवा सण व नवं वर्ष नव संकल्पना नवं शेती च उद्दिष्ट नव चैतन्य आणणारा हा दिवस शेतकरी व शेती साठी नवीन संकल्पना घेऊन येत असतो.या दीवसाच खास वैशिष्ट्य म्हणजे गुढी पाडवा घटस्थापना म्हणजे शेतकर्यांचा सण या दीवसापासुन शेतकरी शेतीच्या कामाला सुरुवात करतात व धरतीमातेला आव्हान करतात तु या वर्षी आम्हाला साथ दे!आणखी एका प्रथेनुसार रब्बी हंगामातील पेरणी झाल्यावर पीक काढल्याच्या आनंदात शेतकरी हा सण साजरा करतात आणि गुढीपाडव्याच्या दिवशी चांगले पीक यावे या उद्देशाने शेतकरी शेतात नांगरणी व शेती घ्या कामाचं मुहूर्त करतात कारण शेतकरी निसर्गाचा खरा मित्र आहे. कारण त्याचे जमिनीशी असलेलं नातं हे मुल आणि आईप्रमाणे असतं.आजही आपल्या देशात शेतकरी जमिनीला आईचा दर्जा देतो आणि मेहनत करून तिच्यातून धान्य पिकवतो.

त्यामुळे जगाचा खरा पोशिंदा शेतकरीच आहे. मात्र असं असूनही आपल्या देशात शेतकऱ्यांची अवस्था दयनिय आहे.

आपल्या कष्टाने पोसणाऱ्या शेतकऱ्यावरच आत्महत्या करण्याची वेळ येते तेव्हा मन हेलावून जाते.एक गोष्ट म्हणजे शेतकरी कष्टाने माळरानात धान्य पिकवून जमिनीतून सोनं पिकवणारा जादूगार! खरंतर या गुढीला उंचावणार तो शेतकरी आज त्यांच्या या सण व परंपरेचा खरा वारसदार आहे.

शेतकरी सुखी तर जग सुखी | अन्नदाता सुखी भव