अखेर सी एस टी पी एस, चंद्रपुर ने रोजगारापासून वंचित असलेल्या प्रकल्पग्रस्तांना कामावर सामावून घेतले
युवा स्वाभिमान पक्ष व जय भवानी कामगार संघटनेच्या संघर्षाला यश
प्रथम तेलंग चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी मो नंबर 7020016684
*चांदसूर्ला*:- सविस्तर वृत्त असे की, मौजा चांदसुर्ला, ता. जि.चंद्रपूर येथील रोजगारापासून वंचित असलेल्या प्रकल्पग्रस्त कामगारांन संदर्भात त्यांना कामावर सामावून घेण्याकरिता समस्त कामगारांनी मागील दोन वर्षापासून चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत निर्मिती केंद्र येथील कंपनी प्रशासनाला वारंवार निवेदने देऊन सुद्धा समस्त कामगारांच्या मागण्या कंपनी प्रशासनाने पूर्ण न केल्यामुळे अखेर त्रस्त कामगारांनी युवा स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री. सुरजभाऊ ठाकरे यांच्याकडे धाव घेतली. कामगारांची समस्या ऐकताच तात्काळ श्री. सुरजभाऊ ठाकरे दिनांक:- १८/०२/२०२२ रोजी कंपनी प्रशासनासह इतर संबंधित विभागांमध्ये निवेदने देऊन सातत्याने पत्रव्यवहार केला. इतक्यावरच न थांबता दिनांक:- ५/०३/२०२२ रोजी श्रमिक पत्रकार संघ चंद्रपूर येथे कामगारांच्या उपस्थित पत्रकार परिषद घेऊन कामगारांना न्याय न मिळाल्यास अथवा त्यांना कामावर सामावून घेतल्यास चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रानी समस्त प्रकल्पग्रस्त कामगारांच्या जमिनी त्यांना परत करून द्याव्यात व जमिनीच्या मोबदल्यात कंपनीने दिलेले ५,००,०००/- लक्ष रुपये आम्ही कंपनीला परत करू! असे ठणकावून सांगत दिनांक:- १०/०३/२०२२ रोजी चंद्रपूर येथील मेजर गेट ताडोबा रोड समोर समस्त प्रकल्पग्रस्त कामगारांसह आमरण उपोषण करण्याचा इशारा देताचं कंपनी प्रशासनाने तात्काळ रोजगारापासून वंचित प्रकल्पग्रस्त कामगारांन संदर्भात आज दिनांक:- ९/०३/२०२२ रोजी दुपारी- ४:३० वाजता सी एस टी पी एस प्रशासन, चंद्रपूर तर्फे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये कामगारांच्या समक्ष कामगारांच्या मागण्या पूर्ण करण्याकरिता १५ दिवसांचा वेळ कंपनीने मागितल्यामुळे सहकार्याची भूमिका ठेवत दिनांक:- १०/०३/२०२२ रोजी करण्यात येणारे आमरण उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले.
त्यानंतर युवा स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री. सुरजभाऊ ठाकरे यांनी सी एस टी पी एस ला चेतावणी दिली होती की जर १५ दिवसानंतर दि. २५/०३/२०२२ पर्यंत सदर प्रकल्पग्रस्त कामगारांना कामावर सामावून न घेतल्यास दिनांक:- २६/०३/२०२२ रोजी स्तळ- मेजर गेट ताडोबा रोड, चंद्रपूर समोर परत आमरण उपोषण करण्यात येईल हे निश्चित.! असे सदर मिटिंग मध्ये कंपनी प्रशासनाला ठणकावून सांगण्यात आले होते. त्यानंतर सी एस टी पी एस चंद्रपुर प्रशासनाने कनव्हेअर बेल्ट च्या कामाकरिता जमीन देऊन भूमिहीन झालेल्या प्रकल्पग्रस्तांच्या रोजगाराकरिता दिनांक:- १५/०३/२०२२ रोजी पाठवलेल्या पत्त्राद्वारे आज दिनांक:- २२/०३/२०२२ ला वेळ- ४:३० वाजता ची बैठक आयोजित करून बैठकीमध्ये श्री. सुरजभाऊ ठाकरे युवा स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा संस्थापक अध्यक्ष जय भवानी कामगार संघटना व समस्त प्रकल्पग्रस्त कामगारांच्या उपस्थितिमध्ये चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र येथील अधिकारी वर्ग व कर्मचारी, कंत्राटदार यांनी दिनांक:- १५/ एप्रिल/२०२२ पासून त्या ९ कामगारांना कामावर बोलवले आहे व नियमितपणे महिन्यातून २६ दिवस दिवट्या देण्याचे लेखी स्वरूपी पत्र दिले आहे. अखेर श्री. सुरजभाऊ ठाकरे व समस्त कामगार यांच्या प्रयत्नाला व त्यांच्या सातत्याने सुरू असलेल्या संघर्षाला अखेर आज यश प्राप्त झाले. कामगारांच्या समस्त मागण्या पूर्ण होताच क्षणी समस्त प्रकल्पग्रस्त कामगारांनी जिल्हाध्यक्ष श्री. सुरजभाऊ ठाकरे यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार मानले. यावेळेस उपस्थित श्री. राहुल चव्हाण, श्री. सुभाष गौरकार, माजी पंचायत समिती सदस्य, अनिकेत उराडे, अजवान टाक, सोनू चव्हाण व जय भवानी कामगार संघटनेचे सहकारी तथा गावकरी उपस्थित होते.