रतन विटाळे यांच्या सतर्कतेने वाचले अपघात ग्रस्त वानराचे जीव
✒करण विटाळे✒
हिंगणघाट तालुका ग्रामीण
प्रतिनिधी : 8806839078
हिंगणघाट : तालुक्यातील कडाजना येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन वानरांचा अपघात झाला त्यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला.
जखमी झालेल्या व मृत् पावलेल्या दोन्ही वानरांकडे रस्त्यावरून ये-जा करणारे लोक त्याकडे दुर्लक्ष करून निघून जात होते. याच दरम्यान रतन विटाळे हे सावली (वाघ) येथुन आपल्या दुचाकीने हिंगणघाटकडे येत असताना हि बाब त्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी हिंगणघाट येथील निसर्गसाथी फाउंडेशनच्या सदस्यांना फोनद्वारे घटनेची माहिती दिली व क्षणाचाही विलंब न करता निसर्गसाथी फाउंडेशनचे सदस्य राकेश झाडे, करण विटाळे व वनविभागाची टिम घटनास्थळी दाखल झाली व जखमी वानराला पुढील उपचारासाठी वर्धा येथे हलविण्यात आले . आता त्याची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे रतन विटाळे यांचे आज सर्वस्तरावर कौतुक करण्यात येत आहे.