विरारमध्ये डॉक्टरांचा हलगर्जी पणा, रुग्णाच्या नातेवाईकांकडून डॉक्टराला रस्त्यात मारहाण.
डॉक्टरांनी हलगर्जी पणा केल्या मुळे महिला रुग्णाचा नाकातुन रक्त बाहेर येत आहे. अशा गंभीर आरोप रुग्णांचा नातेवाईकांनी केला.
✒अभिजित सपकाळ, मुंबई भिवंडी प्रतिनिधी ✒
मुंबई/ विरार,दि.23 मे:- मुंबईच्या उपनगरातुन एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. विरार पूर्व भागातील बालाजी हॉस्पिटलमध्ये आरटीपीसीआरची चाचणी करताना महिला रुग्णाच्या नाकात नळी तुटल्याने नाकातून रक्त येत असल्याचा कुटुंबियांनी आरोप करत डॉक्टरांना शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी विरार पोलीस ठाण्यात डॉ. श्रीराम अय्यर यांनी गुन्हा नोंद केला आहे.
विरार येथील बालाजी हॉस्पिटलमध्ये दि.22 शनिवार ला दुपारच्या सुमारास एका महिला रुग्णास उपचारासाठी आणण्यात आले होते. पण उपचारादरम्यान कोरोना चाचणी करत असताना नाकात नळी तुटली असल्याचा आरोप डॉक्टरांवर करत रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना शिविगाळ करण्यास सुरुवात केली. या दरम्यान डॉक्टर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी जात असताना भर रस्त्यात त्यांना रुग्णाच्या कुटुंबातील व्यक्तींनी मारहाण केली. मारहाणीचे चित्रण मोबाईलमध्ये होत सोशल मीडियावर पसरल्याने मोठी खळबळ माजली. या प्रकरणी डॉक्टर अय्यर यांनी विरार पोलीस ठाण्यात रुग्णाच्या कुटुंबियांविरोधात गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी पोलीस तपास करत आहे.