माथेरान घाटात पर्यटकांच्या वाहनाला अपघात.वाहन रस्त्यावरून दरीत हेलकावे खात अडकले.

माथेरान घाटात पर्यटकांच्या वाहनाला अपघात.वाहन रस्त्यावरून दरीत हेलकावे खात अडकले.

✍🏻 श्वेता शिंदे ✍🏻
माथेरान, शहर प्रतिनिधी
मो.8793831051

माथेरान :- माथेरान फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकाच्या अर्टिका कारला भीषण अपघात घडला.दरम्यान या अपघातात कुठलीही जीवित हानी झाली नसली तरी दैवबलवत्तर म्हणून यातील सात प्रवाशी थोडक्यात बचावले आहेत.घाटातील पीटकर पॉईंट येथील अवघड वळणार चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट रस्त्याची सुरक्षा रेलिंग तोडून खोल दरीच्या बाजूस म्हणजेच रस्ता आणि खोल दरीच्या मध्ये हेलकावे खात अडकून राहिले.सुखरूप बचावले म्हणून पर्यटकांनी सुटकेचा श्वास घेतला.अन्यथा आज मोठी दुर्घटना घडली असती.
रविवार 22 जून,विकेंड सुट्टी असल्याने जगभरातील पर्यटक माथेरान फिरण्यासाठी म्हणून वळले होते.वेगवेगळ्या परिसरातून,जिल्ह्यातून, तालुक्यातील आलेल्या पर्यटकांनी माथेरान येथे आपल्या खाजगी वाहनाने येणे पसंत केल्याचे चित्र होते.ठाणे जिल्ह्यातील बालकुम येथील राहणारा वाहन चालक सुरज येसले हा देखील परिसरातील सहा पर्यटकांना आपल्या वाहन अर्टिका कारमध्ये बसून भाडे म्हणून घेऊन आला होता.सकाळी सुरज हा माथेरान घाट चढण्यासाठी म्हणून नेरळ येथून सुरुवात केली होती. साडे दहा वाजण्याच्या सुमारास वॉटर पाईप या रेल्वे स्थानकाच्या जवळील असलेल्या पिटकर या अवघड वळणावर घाट चढत असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले.एकीकडे घाटात वाहनांची तर दुसरीकडे पर्यटकांची गर्दी होती.रविवार सुट्टी असल्याने ही गर्दी दिसून येत होती.दरम्यान सूरजला घाटात समोरून येणाऱ्या वाहनाचा अंदाज न आल्याने त्याने आपल्या कारची स्टेरिंग गोल फिरवली असता कार वरील नियंत्रण सुटले.कार रस्त्याच्या कडेला असणाऱ्या लोखंडी सुरक्षा रेलिंग तोडून खोल दरीच्या बाजूस अर्धवट अडकून पडली. दैवबळवत्तर म्हणून कार खोल दरीच्या बाजूया न पडता कार रस्ता आणि खोल दरीच्या मध्येच अर्धवट अवस्थेत हवेत हेलकावे खात अडकली.अपघात लक्षात घेता स्थानिक प्रवाशी वाहन चालकांनी अपघातग्रस्त वाहनातील पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढले.यावेळी आपण थोडक्यात बचावलो म्हणून पर्यटकांनी मोकळा श्वास घेतला.अन्यथा ही कार खोल दरीत कोसळली असती तर मोठी दुर्घटना घडली असती.
आज रविवार विकेंड सुट्टी असल्याने माथेरान येथे नेहमी प्रमाणे घाटात वाहनांची लांबच लांब रांग लागून वाहतूक कोंडी देखील झाली होती.त्यामुळे येथील वाहतूक कोंडी सुटणार कधी असा प्रश्न समोर आला.त्यातच नवख्या येणाऱ्या वाहन चालकांना मात्र घाटातील अवघड वळणाचा अंदाज येत नसल्याने येथे अपघात घडत आहेत.या आधी देखील याच ठिकाणी चार वाहने खोल दरीत कोसळत असताना सुरक्षा कठड्यावर अडकून राहिलेले आहे. एमएम आर डी एआणि स्थानिक सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी याकडे लक्ष देण्याची गरज असून आणखी मजबूत सुरक्षा रेलिंग बांधणे गरजेचे आहे.